बेकायदा बांधकामांना संरक्षण देणारे धोरण सरकार लवकरच आणणार आहे या आशेवर कारवाई टाळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या दिघावासीयांना उच्च न्यायालयाने बुधवारी तडाखा दिला. सरकार धोरण आणणार या आशेवर अवलंबून किती वेळ कारवाई टाळण्याची मागणी करणार, हे किती दिवस सहन करायचे, हे कुठे तरी थांबले पाहिजे, अशा शब्दांत न्यायालयाने फटकारले. तसेच सरकारी धोरणाचा फायदा घेणार नाही असे हमीपत्र दिले तरच घरे रिकामी करण्यास मुदतवाढ दिली जाईल, असे बजावत त्याबाबतची भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
दिघा येथील बेकायदा बांधकामांवरील कारवाई थांबवण्यासाठी राज्य सरकारने बेकायदा बांधकामांना संरक्षण देणाऱ्या धोरणाचा आराखडा मंजुरीसाठी दोनवेळा न्यायालयात सादर केला. मात्र विकास नियमावली आणि पालिका कायद्याला बगल देऊन तसेच कुठलाही सारासार विचार न करता हे धोरण आखण्यात आल्याचा ठपका ठेवत दोन्ही वेळेस न्यायालयाने सरकारचे हे धोरण बासनात गुंडाळले. सरकारने धोरण सादर करेपर्यंत न्यायालयाने दिघ्यातील बेकायदा बांधकामांवरील कारवाईला स्थगिती दिली होती. मात्र दुसरे धोरण रद्द करताना या बेकायदा बांधकामे रिकामी करण्यास न्यायालयाने मे अखेरीपर्यंतची मुदत दिली होती. परीक्षाकाळ लक्षात घेऊन ही मुदतवाढ देण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.
असे असतानाही काही रहिवाशांनी पुन्हा एकदा न्यायालयात धाव घेतली आहे. न्या. अभय ओक आणि न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jun 2016 रोजी प्रकाशित
बेकायदा बांधकामांप्रकरणी न्यायालयाचा दिघावासीयांना तडाखा
बेकायदा बांधकामांना संरक्षण देणारे धोरण सरकार लवकरच आणणार आहे
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 09-06-2016 at 00:40 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay high court action against illegal construction