राज्यातील भीषण दुष्काळाने व्याकुळ झालेल्या जनतेच्या मदतीसाठी अखेर काही उद्योगपती पुढे आले आहेत. बिर्ला, महिंद्रा अॅंड महिंद्रा या बडय़ा उद्योगसमूहांबरोबरच आयआरबी, सुपर कन्स्ट्रक्शन या बडय़ा बांधकाम कंपन्यांनी भरीव मदतीचा हात पुढे केला आहे. सुप्रसिद्ध पाश्र्वगायिका आशा भोसले यांच्या पाच लाख रुपयांच्या मदतीव्यतिरिक्त मोठे कलावंत किंवा मायानगरीतील तारे-तारकांनी दुष्काळग्रस्तांकडे पूर्णपणे पाठ फिरविली आहे.
राज्यातील १४ जिल्ह्य़ांतील ११ हजारांहून अधिक गावांमध्ये भीषण टंचाई आहे. पावसाळा येईपर्यंत
मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार २९ एप्रिलला महिंद्रा अॅंड महिंद्रा उद्योगाने १ कोटी रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधीला दिले. आदित्य बिर्ला उद्योग समूहाच्या प्रतिनिधींनी बुधवारी जागातिक कामगार व महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी १ कोटी रुपयांचा धनादेश दिला. बांधकाम व्यावसायातील मोठय़ा कंपन्यांन्याही मदतीसाठी पुढे येऊ लागल्या आहेत. आयआरबी कंपनीने २ कोटी रुपये दुष्काळग्रस्तांसाठी दिले आहेत. त्याचबरोबर सुपर कन्स्ट्रक्शन कंपनीने ५० लाख रुपयांची मदत केली आहे. लार्सन अँड टुब्रो, गोदरेज फाऊंडेशन या उद्योगांनी या पूर्वीच दुष्काळग्रस्तांसाठी भरीव मदत दिली आहे. गेल्या आठवडय़ात आशा भोसले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दुष्काळग्रस्तांसाठी ५ लाख रुपयांची मदत दिली. परंतु चित्रपटसृष्टीतील अन्य कुणी कलाकार अजून मदतीसाठी पुढे आलेला नाही.
संग्रहित लेख, दिनांक 3rd May 2013 रोजी प्रकाशित
दुष्काळग्रस्तांना अखेर उद्योगपतींचा मदतीचा हात महिंद्रा, बिर्ला, आयआरबीची भरीव मदत
राज्यातील भीषण दुष्काळाने व्याकुळ झालेल्या जनतेच्या मदतीसाठी अखेर काही उद्योगपती पुढे आले आहेत. बिर्ला, महिंद्रा अॅंड महिंद्रा या बडय़ा उद्योगसमूहांबरोबरच आयआरबी, सुपर कन्स्ट्रक्शन या बडय़ा बांधकाम कंपन्यांनी भरीव मदतीचा हात पुढे केला आहे.
First published on: 03-05-2013 at 05:21 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Industrialist donate big amount to maharashtra drought stricken