काही राजकीय कारणांमुळे राज्यात वीजपुरवठा खंडीत केला जात असल्याचा भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केलेला आरोप दिशाभूल करणारा असल्याचे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने स्पष्ट केले आहे. मुदतीत देयक रक्कम न भरल्यास विद्युत अधिनियमानुसार वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई नियमितपणे केली जाते. यामुळे जे ग्राहक रक्कम वळेत भरणार नाहीत त्यांच्यावर कारवाई ही होणारच, असेही त्यांनी स्पष्ट केले. मते दिली नाही, यासाठी अनेक भागांमध्ये सरकारकडून वीज व पाणीपुरवठा तोडला जात असून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सूडाचे राजकारण करत असल्याचे आरोप भंडारी यांनी केले होता. याबाबत महावितरणने हा खुलासा केला
आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhav bhandari allegation baseless mahavitaran