डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्यानंतर आता तिसरा कोणाचा क्रमांक लागणार, असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रविवारी सरकारला केला. जितेंद्र आव्हाड यांना धमक्या येत असून, त्यांचा क्रमांक लागू नये म्हणून सरकारने खबरदारी घेण्याची मागणी त्यांनी केली.
तिसरा कौन ही विचारण्याची नामुष्की आल्याची खंत मुंडे यांनी बोलून दाखविली. पुरोगामी चळवळीतील नेत्यांना संपविण्याचा काही शक्तींचा प्रयत्न आहे. पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या काही जणांना धमक्यांची पत्रे येत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमक्यांची पत्रे आली आहेत. त्याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी मुंडे यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader jitendra awhad receives threat to his life