नागपूर : व्यवस्थेविरुद्ध साहित्यिकांच्या मनात काही आले आणि त्यांनी ते सहजपणे लिहावे, अशी स्थिती आज नाही. याचा अर्थ साहित्यिक दांभिक आहेत, असे अजिबात नाही. पण, त्यातील अनेकांना नोकरीची, मुला-बाळांची चिंता असून, सद्यस्थिती घाबरवणारी आहे. त्यामुळेच आज सरकार वा व्यवस्थेविरुद्धचा विद्रोह तितक्या ताकदीने लिखाणात उमटलेला दिसत नाही, असे स्पष्ट मत ज्येष्ठ कवयित्री व समीक्षक प्रभा गणोरकर यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेच्या वतीने ‘ऐसी अक्षरे रसिके..’ हे सर्वसमावेशक साहित्य संमेलन प्रभा गणोरकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच नागपुरात पार पडले. या संमेलनाच्या निमित्ताने त्या खास ‘लोकसत्ता’शी बोलत होत्या. यावेळी गणोरकर यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आजच्या स्वरूपाविषयी खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ‘‘आज साहित्य रसिकांमधील संमेलनाबद्दलचे आकर्षण कमी होत आहे. ही संमेलने आपली सात्विकता गमावून बसली आहेत. संमेलनाच्या आयोजकांना श्रीमंत स्वागताध्यक्ष हवा असतो आणि स्वागताध्यक्षाला मंचावर सत्ताधारी राजकारणी. कारण, त्याला संमेलनाचे ‘भांडवल’ करून राजकारण्यांच्या मदतीने काही लाभ मिळवून घ्यायचे असतात. अशा स्थितीत मंचावरील राजकारण्यांची मने दुखावून कसे चालेल? म्हणून विरोधात बोलणाऱ्या व्यक्तीला संमेलनाच्या मंचापर्यंत पोहोचूच दिले जात नाही. यवतमाळच्या संमेलनावेळी नयनतारा सहगल यांच्याबाबतीतही असेच घडले. त्यावेळी संमेलनाध्यक्ष वा स्वागताध्यक्ष कुणीच बोलले नाही. हा त्यांच्या भीत्रेपणाचा पुरावा नाही का? ’’

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Current situation creating fear in writers says senior writer prabha ganorkar zws
First published on: 30-11-2022 at 05:02 IST