नागपूर : भारतात स्थापन झालेल्या जागतिक लॉजिस्टिक्स समूह ऑलकार्गो ग्रुपने नागपूरमधील सावंगी तालुक्यामध्ये पावसाच्या पाण्याचे संकलन, साठवणूक आणि भूजल पुनर्भरण प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. त्यामुळे त्या भागातील पाण्याची टंचाई दूर होईल व कृषी उपक्रमांना आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकणार आहे. भारत सरकारचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ऑलकार्गो ग्रुपच्या सावंगी कालवा प्रकल्पाचा फायदा असंख्य शेतकऱ्यांना होत आहे हे पाहून खरोखरच आनंद होतो. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विदर्भाला अशा आणखी उपक्रमांची आवश्यकता आहे. जीवन वाचवण्याचे आणि उपजीविकेला आधार देण्याचे ऑलकार्गो ग्रुपचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सावंगी कालवा प्रकल्पामुळे १००,००० घनमीटर भूजल साठा निर्माण झाला आणि दरवर्षी २२५,००० घनमीटर भूजलाचे योगदान मिळाले. या प्रकल्पामुळे ४०० हेक्टर शेतीयोग्य जमीन समृद्ध झाली, २०० कुटुंबांना पिण्याचे पाणी, गुरांसाठी पाणी आणि खरीप, रब्बी पिके आणि भाज्यांसाठी संरक्षक सिंचन उपलब्ध करून देऊन त्याचा फायदा झाला. हा प्रकल्प १२०० हून अधिक शेतकऱ्यांच्या शेती आणि इतर कामांना मदत करेल तसेच ३००० हून अधिक शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अप्रत्यक्षपणे मदत करेल.

या उपक्रमाबद्दल बोलताना ऑलकार्गो ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष शशी किरण शेट्टी म्हणाले, “विदर्भातील पाण्याची टंचाई दूर करण्यात आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या भरभराटीत भूमिका बजावताना आम्हाला आनंद होत आहे. भूजल साठ्याला महत्त्व देण्याबरोबरच जलस्रोत पुनर्संचयित केल्याने नद्या, पाणथळ जागा आणि जंगले पुनरुज्जीवित होतील. पाण्याची स्थिर उपलब्धता केवळ ग्रामीण परिसंस्थांना पुनरुज्जीवित करत नाही तर आर्थिक वाढीला देखील चालना देते – व्यावसायिक शेती सक्षम करणे, पशुधन वाढवणे, लघु उद्योगांना आधार देणे आणि उलट स्थलांतराला प्रोत्साहन देणे अशा गोष्टी शक्य होतात. या प्रकल्पामुळे हवामान बदलामुळे येणाऱ्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी लोकांमध्ये लवचिकता निर्माण होईल. ऑलकार्गो ग्रुप या भागात परिवर्तनकारी बदल घडवून आणण्यासाठी आणि ग्रामीण समुदायांशी संवाद साधून त्यांना उन्नत आणि सक्षम करण्यासाठी कार्यरत आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांनुसार (यूएनएसडीजी) ऑलकार्गो ग्रुप सामुदायिक विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी वचनबद्ध आहे. आपल्या शाश्वतता लक्ष्यांचा एक भाग म्हणून ऑलकार्गो ग्रुप २०४० पर्यंत कार्बन तटस्थता साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. हा उपक्रम ऑलकार्गो ग्रुपच्या सीएसआर शाखा अवश्य फाउंडेशनचा एक भाग आहे. तो महाराष्ट्रातील विदर्भ प्रदेशातील पाण्याची कमतरता असलेल्या भागात पाण्याची उपलब्धता वाढवून प्रदेशाच्या कृषी पर्यावरणाचे समग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur allcargo group initiative improving living conditions of more than 4000 people rbt 74 sud 02