उरण : तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणातील एमआयडीसीच्या जलवाहिनीला गुरुवारी रात्री १० वाजता गळती लागली. त्यामुळे हजारो लीटर पाणी वाया गेले. मात्र या जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करण्यात आल्याने उरणकरांवर येणारे पाणी कपातीचे संकट दूर झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – व्ही. पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचं दीर्घ आजाराने निधन, ५६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हेही वाचा – मुंबई : म्हाडा सोडतीतील अडीचशेहून अधिक घरे अखेर रिक्त राहणार! प्रतीक्षा यादीतील कपात भोवली!

रानसई धरणाच्या लगत असलेल्या चिर्ले गावानजीकच्या जलवाहिनीला रात्री गळती लागली. यामुळे पंधरा ते वीस फूट उंचीची कारंजी निर्माण झाली होती. या घटनेनंतर एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांनी धरणातील पाणीपुरवठा बंद करून दुरुस्ती करण्यात आली. रानसई धरणाच्या जलवाहिनीला गळती लागली होती, त्याची दुरुस्ती करण्यात आली असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे अभियंता विठ्ठल पाचपुंड यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leakage in the water channel of midc of uran water supply is smooth due to channel repair at night ssb