पालघर : वाडा तालुक्यातील नेहरोली गावातील एका बंद घरात तीन मानवी सापळे आढळून आल्याचा प्रकार घडला आहे. आई, वडील व मुलगी अशा तिघांचीही हत्या करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. वाडा – भिवंडी या राज्य महामार्गालगत असलेल्या नेहरोली गावात हा प्रकार झाला असल्याचे आज दिसून आले. ही हत्त्या १५ दिवसांपूर्वी झाल्याने तिघांच्याही शरीराचे सापळे झालेले दिसून आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…

हेही वाचा – द्राक्षांव्यतिरिक्त अन्य फळांचे वाइन उद्योग मरणपंथाला

नेहरोली येथे गेल्या अनेक वर्षांपासून मुकुंद राठोड (७०), कांचन राठोड (६५) हे वयोवृद्ध पती पत्नी व त्यांची दिव्यांग मुलगी संगिता राठोड हे कुटुंब रहात होते. त्यांची दोन्ही मुले नोकरीनिमित्त वसई येथे रहात आहेत. मुकुंद राठोड यांच्या नेहरोली येथील बंद घराच्या परिसरात घाण वास येत असल्याकारणाने येथील एका ग्रामस्थांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली. मिळालेल्या माहितीवरून बंद घराचा दरवाजा उघडला असता येथील एका खोलीत कांचन राठोड, व संगिता राठोड यांचा संपूर्ण सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला तर बाथरूममध्ये मुकुंद राठोड यांचा मृतदेह आढळला. हा संपूर्ण प्रकार संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. वाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palghar three human dead body in closed house in nehroli village