पालघर :  जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्थानकांमध्ये मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. असलेल्या सुविधांचीही दुरवस्था झाली असून तसेच आपत्कालीन व्यवस्थाही निरुपयोगी असल्यामुळे प्रवाशांना त्रासदायक  प्रवासातून जावे लागत आहे. वैतरणा ते डहाणू रेल्वे स्थानकांवरील अनेक स्थानकांमध्ये सुविधा यंत्रणांमध्ये  त्रुटी पाहावयास मिळत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पश्चिम रेल्वेवरील वैतरणा ते डहाणू ही उपनगरीय रेल्वे सेवा म्हणून घोषित करण्यात आली आहे. या दरम्यान आठ स्थानके येतात.  या स्थानकातून दररोज लाखो प्रवाशांची  ये-जा सुरू असते. मात्र स्थानकांवरील अनेक भौतिक व मूलभूत सुविधा तसेच आपत्कालीन यंत्रणांबाबत या भागाला नेहमीच रेल्वे सावत्र दर्जा देत  असल्याचा प्रवासांचा आरोप असतो.  रेल्वे स्थानकांवर प्रवासी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही नाहीत. जे सुरू केलेत तेही बंद किंवा नादुरुस्त आहेत. येथील अग्निशमन यंत्रणा घटनेच्या वेळेत पोहोचू शकत नाही. कारण स्थानकात येण्यासाठी मार्गच मोकळा नाही. स्थानक परिसरात अतिक्रमण, खासगी वाहनांचे पार्किंग, बस थांबे व इतर कारणांमुळे रस्ते अरुंद आहेत.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passengers suffer due to lack of basic facilities on many railway stations in district palghar zws
First published on: 25-01-2023 at 05:32 IST