दोन कुटंबात झालेल्या वादात एका महिलेला जीव गमवावा लागला आहे. पालघर जिल्ह्यात व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे दोन कुटुंबात वाद झाला आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत महिला गंभीर जखमी झाली होती आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दोन महिलांसह तिघांना पोलिसांनी या महिलेच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एका ४८ वर्षीय महिलेचा दोन कुटुंबांमध्ये झालेल्या भांडणात गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. मृताच्या मुलीने ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवरून १० फेब्रुवारी रोजी हाणामारी झाली होती. ही घटना बोईसर येथील शिवाजी नगर परिसरात घडली. पोलिसांनी सांगितले की, मृत महिलेची मुलगी प्रीती प्रसाद (वय, २०) हिने तिच्या शेजारी राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीसोबतचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर टाकला होता. मात्र हे त्या मुलीला आणि तिच्या घरच्यांना आवडले नाही.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman killed in fight between two families over daughters whatsapp status in palghar hrc
First published on: 14-02-2022 at 10:18 IST