• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. why does arthritis occur during monsoons sap

पावसाळ्यात सांधेदुखीची समस्या का उद्भवते?

Joint Pain: हे दुखणं आणि वेदना शरीरातील वात किंवा हवेच्या प्रमाणात असमतोल झाल्यामुळे होते. पण यात काळजी करण्यासारखे काही नाही. कारण- त्यासाठी दोन उपाय आहेत.

Updated: August 28, 2024 16:25 IST
Follow Us
  • Why does arthritis occur during monsoons
    1/9

    पावसाळ्याच्या दिवसांत अनेक व्यक्तींना सांधेदुखीच्या समस्या जाणवतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    आयुर्वेद चिकित्सक डॉ. मनीषा मिश्रा यांनी सांगितले की, हे दुखणं आणि वेदना शरीरातील वात किंवा हवेच्या प्रमाणात असमतोल झाल्यामुळे होते. पण यात काळजी करण्यासारखे काही नाही. कारण- त्यासाठी दोन उपाय आहेत. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9

    त्यातील एक उपाय म्हणजे कोरड्या आल्याच्या पावडरचा चहा. हे वात कमी करण्यास मदत करणारे एक पेय आहे. त्यासाठी “कोरड्या आल्याची पावडर पाण्यात उकळून घ्या आणि ते पेय दिवसातून दोनदा सकाळ आणि संध्याकाळी प्या.” (फोटो सौजन्य: Freepik)

  • डॉ. मिश्रा यांनी सांगितलेला दुसरा उपाय म्हणजे शरीराच्या ज्या भागात दुखत असेल, त्या भागावर एरंडेल तेल लावावे. त्यामुळे सांधेदुखी बरी होते आणि तुम्हाला व्यवस्थित चालता येईल. (फोटो सौजन्य: Freepik)
    “आयुर्वेदात विसर्ग काल म्हणून ओळखला जाणारा हा काळ, जेव्हा पृथ्वी सूर्यापासून दूर जाते आणि चंद्राचा प्रभाव वाढतो आणि ज्यामुळे वातावरण थंड होते. पावसाळ्याचा ऋतू वात आणि कफ दोषांशी संबंधित आहे; जो या काळात वाढतो. पाणी आणि पृथ्वीच्या घटकांचे प्रतिनिधित्व करणारा कफ दोषदेखील या काळात वाढतो”, असे शास्त्रीय हठ योग शिक्षक व जीवनशैली तज्ज्ञ श्लोका यांनी सांगितले. (फोटो सौजन्य: Freepik)
    थंड, ओलसर आणि बदलत्या हवामानामुळे वात दोष वाढून शरीरात अस्थिरता येते. “या असंतुलनामुळे सांध्यातील ओलावा कमी होतो आणि त्यामुळे घर्षण, जळजळ, सांधेदुखी, स्नायू दुखणे आणि कडकपणा येतो,” असे श्लोका यांनी सांगितले. (फोटो सौजन्य: Freepik)
  • 4/9

    तज्ञांनी सांगितले की, “थंड, ओलसर हवामानामुळे पाचन अग्नी अधिक कमकुवत होतो. त्यामुळे पचन नीट होत नाही आणि त्यामुळे विषारी पदार्थ शरीरात जमा होतात. पचन बिघडल्यामुळे शरीरात जमा होणारा आमयुक्त विषारी पदार्थ शरीराच्या विविध भागांमध्ये जळजळ आणि वेदनांना कारणीभूत ठरतो.” (फोटो सौजन्य: Freepik)

  • सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी मोहरीचे तेल थोडे कोमट करा आणि प्रभावित स्नायू किंवा सांध्यांमध्ये हलक्या हाताने मसाज करा. सांधेदुखी कमी करण्यासाठी निलगिरी किंवा पेपरमिंट यांसारख्या तेलांचे काही थेंब घाला. हा मसाज रोज झोपायच्या आधी करा. (फोटो सौजन्य: Freepik)
  • 5/9

    मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून, त्याची पेस्ट बनवा. पेस्ट प्रभावित भागात लावा आणि स्वच्छ कापडाने झाकून ठेवा. हे ३०-६० मिनिटे राहू द्या. नंतर स्वच्छ धुऊन घ्या. ही पेस्ट सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करते. यामुळेही सांधेदुखीचा त्रास कमी होईल. (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Why does arthritis occur during monsoons sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.