Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. should menstruation periods stop you from seeking blessings during pilgrimage what sant premanand ji maharaj advises kvg

तीर्थयात्रेदरम्यान मासिक पाळी आली तर ‘तिने’ दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं की…

मासिक पाळी हा निंदनीय किंवा तुच्छ विषय नसून ती एक दैवी जबाबदारी आहे, असे मत प्रेमानंद महाराज यांनी व्यक्त केले आहे.

April 5, 2025 21:21 IST
Follow Us
  • darshan during menstruation
    1/11

    तीर्थयात्रेला भारतात जीवनाचा एक महत्त्वाचा आणि पवित्र भाग मानले जाते. आयुष्यात एकदा तरी तीर्थक्षेत्रांना भेट देणे हे प्रत्येक भाविकाचे स्वप्न असते. पण जेव्हा महिला आणि त्यांच्या मासिक पाळीचा प्रश्न येतो, तेव्हा हा विषय अनेकदा गोंधळ निर्माण करतो. या विषयाला सामाजिक आणि धार्मिक कंगोरे आहेत. (Photo Source: Pexels)

  • 2/11

    अशात महिला जेव्हा भक्तीभावाने देवाचे दर्शन घेण्यासाठी पवित्र ठिकाणी जातात आणि अचानक त्यांची मासिक पाळी सुरू होते, तेव्हा एक मोठा प्रश्न उद्भवतो. तो म्हणजे अशा स्थितीत देवाचे दर्शन घेणे योग्य आहे का? (Photo Source: Pexels)

  • 3/11

    आजही आपल्या समाजात मासिक पाळीबद्दल अनेक प्रकारचे गैरसमज आहेत. परंतु मासिक पाळी ही एक नैसर्गिक आणि अंतर्गत शारीरिक प्रक्रिया आहे जी प्रत्येक स्त्रीच्या जीवनाचा एक सामान्य भाग आहे. (Photo Source: Pexels)

  • 4/11

    वृंदावनचे प्रसिद्ध संत प्रेमानंद जी महाराज यांनी या विषयावर अतिशय सुंदर उत्तर दिले आहे. एका महिलेने त्यांना विचारले की, जर तीर्थयात्रेला आल्यानंतर मासिक पाळी येत असेल तर तिने मंदिरात जावे का? यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “दर्शन घेण्याची संधी गमावू नये.” (Photo Source: Shri Hit Premanand Ji Maharaj/Facebook)

  • 5/11

    प्रेमानंद यांचा असा विश्वास आहे की, जर एखादी महिला हजारो किलोमीटर अंतरावरून तीर्थस्थळी पोहोचली असेल आणि अचानक तिला मासिक पाळी आली तर ती आंघोळ करून, चंदन, गंगाजल किंवा भागवत प्रसाद शिंपडून स्वतःला शुद्ध करू शकते आणि दूरवरून दर्शन घेऊ शकते.
    (Photo Source: Shri Hit Premanand Ji Maharaj/Facebook)

  • 6/11

    त्यांनी असेही म्हटले की, या काळात महिलांनी सेवाकार्य करणे, मंदिरातील वस्तूंना स्पर्श करणे किंवा प्रसाद देणे टाळावे. पण केवळ यामुळे एखाद्याला दर्शनापासून वंचित ठेवणे योग्य नाही, कारण प्रत्येकाला वारंवार तीर्थयात्रेला जाण्याची संधी मिळत नाही. (Photo Source: Pexels)

  • 7/11

    “काही लोक आर्थिक, तर काही शारीरिक अडचणींना तोंड देऊन तीर्थस्थळी पोहोचतात, अशा परिस्थितीत देवाचे दर्शन घेण्याचे सौभाग्य का गमावावे?” प्रेमानंद यांनी मासिक पाळीशी संबंधित एका जुन्या धार्मिक कथेचाही उल्लेख केला. ज्यामुळे हा विषय आध्यात्मिक दृष्टिकोनातून समजून घेण्यास मदत होते. (Photo Source: Pexels)

  • 8/11

    एका पौराणिक कथेनुसार, वृत्रासुराचा वध केल्यानंतर देवराज इंद्र यांच्यावर ब्रह्महत्येचा (ब्राह्मणाचा खून) दोष लागला. जेव्हा ब्रह्मा ऋषींनी या दोषाचे विभाजन केले तेव्हा त्याचा एक भाग स्त्रियांवर पडला आणि मासिक पाळीची सुरूवात झाली. (Photo Source: Pexels)

  • 9/11

    प्रेमानंद यांनी स्पष्ट केले की, हा दोष फेसाच्या स्वरूपात नदीत गेला, झाडांमध्ये तो डिंकाच्या स्वरूपात गेला, जमिनीत तो उष्णता किंवा नापिकीच्या स्वरूपात गेला आणि स्त्रियांमध्ये तो मासिक पाळीच्या स्वरूपात आला. म्हणून ते पाप नाही तर महान त्याग आणि सहनशीलतेचे प्रतीक आहे.
    (Photo Source: Pexels)

  • 10/11

    ते पुढे म्हणाले, “वरील सर्वांनी देवराज इंद्राचे पाप स्वतःवर घेतले. त्यामुळे मासिक पाळी गुन्हा नाही.” जर एखादी स्त्री विचार, शब्द आणि कृतीने देवाला समर्पित असेल, तर केवळ शारीरिक प्रक्रियेमुळे तिला देवाचे दर्शन घेण्यापासून रोखणे हे धर्माच्या मूलभूत तत्त्वांच्या विरुद्ध आहे. (Photo Source: Pexels)

  • 11/11

    प्रेमानंद महाराजांच्या मते, जर अशी परिस्थिती उद्भवली तर या प्रसंगी पवित्रता राखणे गरजेचे आहे. स्नान, स्वच्छता आणि मर्यादांचे पालन केले पाहिजे. परंतु दूरवरून देवाचे दर्शन नक्कीच घेतले पाहिजे, जेणेकरून तीर्थयात्रेचा उद्देश पूर्ण होईल आणि आत्मिक समाधानही लाभेल. (Photo Source: Shri Hit Premanand Ji Maharaj/Facebook)

TOPICS
तीर्थयात्राPilgrimageमहिलाWomanलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Should menstruation periods stop you from seeking blessings during pilgrimage what sant premanand ji maharaj advises kvg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.