-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक केली. त्यावेळी त्यांनी देशातील करोनाच्या सद्य स्थितीबाबत चर्चा केली.
-
देशातील काही भागात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याची दखल घेतानाच भारत चांगल्या स्थितीत असल्याचे मोदी बैठकीनंतर म्हणाले.
-
"करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि मृत्यूदर याबाबतीत भारत दुसऱ्या देशाच्या तुलनेत चांगल्या स्थितीमध्ये आहे. हे सर्व एकत्रित प्रयत्नांमुळे शक्य झाले" असे मोदी या बैठकीत म्हणाले.
-
देशात पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे लॉकडाऊनची शक्यता वर्तवली जात आहे.
-
लस हाच यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. त्यामुळे लस कधी येणार याकडे सगळयांचे लक्ष लागलेले असताना पंतप्रधान मोदींनी लशीबाबत एक महत्त्वाचे विधान केले.
-
भारत जी कुठली लस आपल्या नागरिकांना देईल, ती वैज्ञानिक दृष्टीने पूर्णपणे सुरक्षित असली पाहिजे. वेगाइतकीच सुरक्षितता सुद्धा महत्त्वाची आहे.
-
राज्यांबरोबर समन्वय साधून लस वितरणाची रणनिती ठरवली जाईल, असे त्यांनी सांगितले. शीतगृह कोल्ड स्टोअरेजसाठी राज्यांनी आतापासूनच काम सुरु करावे, असे मोदींनी सांगितले.
-
लस सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्लान लवकरात लवकर पाठवा, अशी त्यांनी सर्व राज्यांना विनंती केली. लशीचे काम सुरु आहे. पण त्यात जरापण निष्काळजीपणा करु नका, अशी मी आपल्याला विनंती करतो असे मोदी म्हणाले.
-
करोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण पाच टक्क्यांच्या खाली आणण्यासाठी आणि मृत्यूदर एक टक्क्यापेक्षा कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले.
-
पंतप्रधानांना करोनावरील लशीच्या वितरणासंदर्भात सूचना केल्या. त्याचबरोबर करोनावरील लस कधीपर्यंत येईल हे आपण ठरवू शकत नाही, अशी माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली.
दुसरी लाट, लॉकडाउनची चर्चा असताना पंतप्रधान मोदींचे लशी संदर्भात महत्त्वाचे विधान
Web Title: Pm modi praises indias fight against covid 19 says vaccine safety as crucial as speed dmp