-
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्य कारभारावरून सडकून टीका केली.
-
एकनाथ शिंदेंना संपूर्ण ठाणे माझ्या हातात असावं, असं वाटत असल्याचा आरोप यावेळी जितेंद्र आव्हाडांनी केला.
-
तसेच “अरे शरद पवारांनी बारामतीत एवढी वर्षे राजकारण केलं, त्यांचंही बारामती होऊ शकलं नाही,” असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं.
-
ते बुधवारी (४ जानेवारी) नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलत होते. ते नेमकं काय म्हणाले त्याचा हा आढावा…
-
कायदा आणि सुव्यवस्था आमच्या हातात आहे. आम्ही सांगू तो कायदा आणि तो पोलिसांनी मानला पाहिजे, अशा पद्धतीचा कायदा महाराष्ट्रभर राबवला जातो आहे – जितेंद्र आव्हाड
-
ठाण्यात तर टिपून टिपून मारतात, तसं टिपून टिपून मारलं जात आहे – जितेंद्र आव्हाड
-
मुख्यमंत्र्यांना वाटतं संपूर्ण ठाणे माझ्या हातात असावं – जितेंद्र आव्हाड
-
अरे शरद पवारांनी बारामतीत एवढे वर्षे राजकारण केलं, संपूर्ण बारामती त्यांचीही होऊ शकली नाही – जितेंद्र आव्हाड
-
हे मुख्यमंत्री नाहीत, तर ‘व्हाईसरॉय ऑफ महाराष्ट्र’ आहेत – जितेंद्र आव्हाड
-
व्हाईसरॉय कसा त्याच्या हातात कायदा असल्याप्रमाणे कोणाचंही ऐकायचा नाही, तसेच एकनाथ शिंदे व्हॉईसरॉय आहेत – जितेंद्र आव्हाड
-
नवी मुंबईच्या निवडणुका येतील तेव्हा नशीब पोलिसांना मतदान करायला सांगितलं नाही – जितेंद्र आव्हाड
-
आता एवढंच शिल्लक राहिलं आहे. नाहीतर पोलिसांना सांगतील तुम्ही जाऊन बटन दाबून या – जितेंद्र आव्हाड
-
इतके वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच होत नाहीत. असं कधी होतं का? – जितेंद्र आव्हाड
-
तीनचा वार्ड असावा असं आत्ताचे मुख्यमंत्री नगरविकास मंत्री होते तेव्हा नक्की झालं – जितेंद्र आव्हाड
-
त्यासाठी १५०० कोटी रुपये खर्च झाला – जितेंद्र आव्हाड
-
आता ते म्हणत आहेत की चारचा वार्ड करा – जितेंद्र आव्हाड
-
कोणत्याही नगरसेवकाला इथे तिथे जाऊ न देता सगळ्यांची घट्ट मोट बांधा – जितेंद्र आव्हाड
-
कार्यक्रमाला न आलेल्या नगरसेवकांना निरोप द्या की, कार्यक्रमाला येत जावा – जितेंद्र आव्हाड
-
प्रचाराला जितेंद्र आव्हाडची गरज लागणारच आहे – जितेंद्र आव्हाड
-
मी आणि आनंद परांजपे दोघेही आलो असताना नगरसेवकांनी दांड्या मारायचं हे काही योग्य नाही – जितेंद्र आव्हाड
-
(सर्व छायाचित्र संग्रहित)
Photos : “संपूर्ण बारामती पवारांची होऊ शकली नाही” ते “ठाण्यात टिपून टिपून मारतात”, जितेंद्र आव्हाडांची महत्त्वाची विधानं
जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्य कारभारावरून सडकून टीका केली. बुधवारी (४ जानेवारी) नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात ते नेमकं काय म्हणाले त्याचा हा आढावा…
Web Title: Important statement of ncp mla jitendra awhad on sharad pawar baramati eknath shinde pbs