-
४ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला ५ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. (AP)
-
यावेळी भारतीय गोलंदाजांनी अतिशय निराशाजनक कामगिरी केली.
-
याशिवाय अशी काही कारणे होती, ज्यामुळे भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. ही कारणे कोणती आहेत ते जाणून घेऊया.
-
केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अतिशय दमदार सुरुवात केली. मात्र मधल्या फळीतील फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. (AP)
-
ऋषभ पंत अवघ्या १० धावा करून बाद झाला.
-
यानंतर सूर्यकुमार यादवने १३ धावांचे योगदान दिले.
-
त्याचवेळी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला खातेही उघडता आले नाही.
-
भुवनेश्वर कुमार १९व्या षटकात सपशेल अपयशी ठरला. या षटकात त्याने एकही विकेट न मिळवता तब्बल १९ धावा दिल्या.
-
गोलंदाजीत भुवनेश्वरची कामगिरी निराशाजनक ठरली. त्याने चार षटकात ४० धावा देऊन फक्त एक विकेट मिळवला.
-
कर्णधार रोहित शर्माने ऑल राऊंडर खेळाडूंचा योग्य वापर केला नाही. त्याने हार्दिक पांड्याला चार षटके दिली, मात्र दीपक हुडाला एकही षटक खेळू दिले नाही.
-
जेव्हा मधल्या ओव्हरमध्ये युझवेंद्र चहल नीट खेळात नव्हता तेव्हा रोहित दीपकला दोन ओव्हर देऊ शकला असता.
-
या सामन्यात भारतीय खेळाडूंची फिल्डिंग अतिशय खराब होती. १८व्या षटकात रवी बिश्नोईच्या चेंडूवर अर्शदीप सिंगने कॅच सोडला. ज्याचा फटका भारतीय संघाला बसला. परिणामी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
-
त्याचवेळी, भारतीय संघाच्या गोलंदाजांनी खूप वाइड चेंडू टाकले आणि विरुद्ध संघाला अतिरिक्त धावा देऊ केल्या.
-
प्रकृती अस्वास्थ्यामुळे आवेश खान पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माला पाकिस्तानविरुद्ध तीन फिरकीपटू गोलंदाजांना खेळवावे लागले.
-
यामध्ये युझवेंद्र चहल चांगलाच महागात पडला. त्याने चार षटकांत ४३ धावा देऊन १ बळी घेतला. (सर्व फोटो : ट्विटर)
कोण म्हणतं भारत अर्शदीपमुळे हरला? टीम इंडियाच्या पराभवाची ‘ही’ आहेत कारणं
अशी काही कारणे होती, ज्यामुळे भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. ही कारणे कोणती आहेत ते जाणून घेऊया.
Web Title: Who says we lost because of arshdeep these are the reasons for india defeat pvp