-
देशभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या लाटेमुळे अनेक उद्योगांना याचा फटका बसला आहे. फळांचा राजा अशी ओळख असलेल्या आंब्यालाही यंदा या करोनाचा फटका बसताना दिसत आहे. (सर्व छायाचित्र – पवन खेंगरे)
-
पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत आंब्याच्या पेट्या येण्यास सुरुवात झालेली आहे. सध्याच्या घडीला दिवसाला अंदाजे १ ते २ हजार पेट्या पुण्यात येत आहेत.
-
गेल्या हंगामात याच कालावधीमध्ये पुण्यात अंदाजे दिवसाला ८ ते १० हजार पेट्या येत होत्या. बाजारात आवक कमी झाली असली तरीही कामगार वर्ग नेहमीप्रमाणे आपल्या कामात गुंतलेला दिसत आहे.
-
मात्र करोना विषाणूमुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ग्राहकच बाजारपेठेत फिरकत नाहीये.
-
त्यामुळे फक्त वाट बघण हेच येथील व्यापारी आणि कामगारांच्या नशिबात दिसत आहे. देवगड, रत्नागिरी भागातील शेतकऱ्यांना यंदा तुलेनेने कमी पैसे मिळाले आहेत.
-
एका पेटीचा दर हा अंदाजे १ ते अडीच हजारांच्या घरात आहे. हंगामाच्या सुरुवातीला एवढा कमी भाव असल्यामुळे या परिस्थितीचा कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो आहे.
-
आंबे पेटीत भरुन घेऊन जाताना बाजार समितीतला कामगार वर्ग…
-
मोठ्या मुश्किलीने एखाद-दुसरा ग्राहक आंब्याच्या खरेदीसाठी बाजार समितीत येताना दिसत आहे.
-
एरवी ज्या फळासाठी ग्राहक झुंबड करतात तोच आंबा करायला फार कमी लोकं येत आहेत
-
हातात आलेलं गिऱ्हाईक जाऊ द्यायचं नाही…इतकच आता इकडच्या व्यापाऱ्यांना कळतंय.
करोनाचा फटका : फळांचा राजाही बाजारपेठेत पाहतोय ग्राहकांची वाट
पुणे बाजार समितीत आंब्याची आवक घटली
Web Title: Mangoes started coming in pune apmc but no customers because of lock down psd