• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. report of bhutan stopping supply of channel water to assam is not true sgy

चीन, नेपाळने आगळीक केल्यानंतर आता भूतानने भारताचं पाणी रोखलं? काय आहे सत्य

भूतानने पाणी रोखल्याने आसाममधील शेतकरी रस्त्यावर

Updated: September 10, 2021 14:28 IST
Follow Us
  • चीन आणि नेपाळने आगळीक केल्यानंतर भूताननेही भारताविरोधात दंड थोपटले असल्याची चर्चा गुरुवारी रंगली होती. (सर्व फोटो सौजन्य - Tshering Namgyel फेसबुक )
    1/17

    चीन आणि नेपाळने आगळीक केल्यानंतर भूताननेही भारताविरोधात दंड थोपटले असल्याची चर्चा गुरुवारी रंगली होती. (सर्व फोटो सौजन्य – Tshering Namgyel फेसबुक )

  • 2/17

    भूतानने भारताला मिळणारं पाणी रोखलं असल्याचं वृत्त देण्यात आलं आलं होतं.

  • 3/17

    यासोबत करोनाच्या पार्श्वभूमीवर भूतानने परदेशी नागरिकांना देशात प्रवेश बंद केला असून यामध्ये भारतीय शेतकरी असल्याचीही चर्चा होती.

  • 4/17

    गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बक्सा येथील शेतकरी आंदोलन करत आहेत. सोमवारी आंदोलकांनी रोगिंया-भूतान रस्ता अडवला होता.

  • 5/17

    केंद्र सरकारने भूतानसमोर हा मुद्दा उपस्थित करावा अशी शेतकऱ्यांची मागणी होती.

  • 6/17

    पण एएनआयने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, भूतानने आसामला जाणारं पाणी रोखलं असल्याचं वृत्त चुकीचं असून यामध्ये सत्य नाही.

  • 7/17

    भूतानने आसामला जाणारं पाणी रोखलं असल्याचं वृत्त चुकीचं असून यामध्ये सत्यता नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

  • 8/17

    याउलट आसामला मिळणाऱ्या पाण्याचा प्रवाह जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी वाहिन्यांमध्ये दुरुस्ती करण्याचं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

  • 9/17

    भूतानमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याचे फोटो तेथील नागरिकाने फेसबुकवर शेअर केले आहेत.

  • 10/17

    गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हा प्रशासन, उपविभाग प्रशासन, महापौर कार्यालय, कोविड टास्क फोर्सचे सदस्य, सरकारी सेवकांचे स्वयंसेवक, भूतानतील स्थानिक समुदायांचे सदस्य सगळं काही सुरळीत व्हावं यासाठी मेहनत घेत आहेत.

  • 11/17

    सतत पाऊस पडत असल्याने डोंगर परिसरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला आहे.

  • 12/17

    यामुळे भूतानमधील सरकारी यंत्रणा पाण्याचा प्रवाह सुरळीत व्हावा यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे.

  • 13/17

    भारतीय मित्र आमची समस्या समजून घेतील अशी अपेक्षा भूतानने व्यक्त केली आहे.

  • 14/17

    आसामच्या बक्सा जिल्ह्यातील २६ पेक्षा जास्त गावांमधील जवळपास सहा हजार शेतकरी शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याकरिता डोंग प्रकल्पावर निर्भर आहेत.

  • 15/17

    १९५३ पासून शेतकरी सिंचनासाठी भूतानमधील नद्यांच्या पाण्याचा वापर करत आहेत.

  • 16/17

    शेतीची कामं सुरु झाल्यानंतर प्रत्येक वर्षी शेतकरी भारत-भूतान सीमेवर जाऊन नदीचं पाणी आसामला मिळेल याची व्यवस्था करतात.

  • 17/17

    शेजारी असणाऱ्या भारतासोबत आपली मैत्री कायम ठेवण्यास आपण कटिबद्ध असल्याचं भूतानने सांगितलं आहे.

Web Title: Report of bhutan stopping supply of channel water to assam is not true sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.