-
नवी मुंबई विमानतळ परिसरातील ओवळे गावाच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.
-
त्या शर्यतीतील अखेरच्या क्षणांचे हे रोमांचक दृश्य.
-
सुमारे दोनशेहून अधिक बैलगाडा मालकांनी या शर्यतीत सहभाग घेतला होता.
-
बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवण्यात आल्यानंतर सहा वर्षांनी पनवेलच्या ग्रामीण भागात शर्यतींचे आयोजन करण्यात आले.
-
बैलगाडा शर्यतीसाठी शासनाने नियमावली लागू केली आहे. त्यानुसार शर्यतींसाठी पंधरा दिवस अगोदर परवानगी घेणे आवश्यक आहे.
-
याशिवाय अनामत रक्कम, बैलाची शारीरिक तंदुरुस्ती प्रमाणपत्र, शर्यतीसाठी बैलांची छळातून मुक्तता, बैलांना उत्तेजक द्रव्य-मद्याचा वापर न करणे आदी नियमांचा समावेश आहे.
-
बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेल्या ४०० वर्षांची परंपरा राहिली आहे.
-
सध्या सर्वत्र यात्रा जत्रांमध्ये बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्याची चढाओढ लागली आहे.
-
(फोटो – नरेंद्र वास्कर, इंडियन एक्सप्रेस)
Photos : नवी मुंबईत बैलगाडा शर्यतीचा धुरळा; तब्बल सहा वर्षांनी रंगला थरार
Web Title: Hundreds of bullock cart race bailgada sharyat at navi mumbai panvel road near owlegaon photos sdn