• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. republic day 2025 evolution of our indian flag from 1906 to 1947 spl

Photos : भारताचा पहिला ध्वज ते आताचा तिरंगा, १९०६ ते १९४७ पर्यंत देशाचा राष्ट्रध्वज कसा बदलत गेला? पाहा फोटो

History of Indian National Flag: भारताचा राष्ट्रध्वज २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेत स्वीकारण्यात आला, जो भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण होता. हा ध्वज भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून उदयास आला, परंतु त्याच्या उत्क्रांतीचा प्रवास १९०६ पासून सुरू होतो.

Updated: January 26, 2025 11:43 IST
Follow Us
  • Indian flag from 1906-1947
    1/7

    भारताचा राष्ट्रध्वज स्वातंत्र्य लढ्याची आणि आपल्या संघर्षाची दीर्घ आणि समृद्ध कथा सांगतो. हा ध्वज १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटीश साम्राज्यापासून भारताच्या स्वातंत्र्यानंतर स्वीकारण्यात आला. भारतीय ध्वजाचे सध्याचे स्वरूप २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने मंजूर केले होते, परंतु याआधीही अनेक वेळा भारतीय ध्वजाचे वेगवेगळे रूप दिसले होते. या प्रवासाशी निगडीत अनेक ऐतिहासिक घटना आणि संदर्भ आहेत, ज्यामुळे भारतीय ध्वजाचे सध्याचे स्वरूप तयार करण्यात मदत झाली. भारतीय ध्वजाची विविध रूपे आणि त्यांची उत्क्रांती जाणून घेऊयात. (Photo Source: Social Media)

  • 2/7

    पहिला ध्वज (१९०६)
    भारतातील पहिला राष्ट्रीय ध्वज ७ ऑगस्ट १९०६ रोजी पारसी बागान स्क्वेअर (ग्रीन पार्क), कोलकाता येथे फडकवण्यात आला. हा ध्वज लाल, पिवळा आणि हिरवा अशा तीन आडव्या पट्ट्यांमध्ये बनलेला होता. या ध्वजाच्या मध्यभागी देवनागरी लिपीत ‘वंदे मातरम’ लिहिलेले होते. या ध्वजाने भारतीय स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात केली परंतू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने तो स्वीकारला नाही. (Photo Source: Social Media)

  • 3/7

    दुसरा ध्वज (१९०७)
    दुसरा भारतीय ध्वज मॅडम भिकाजी कामा यांनी २२ ऑगस्ट १९०७ रोजी जर्मनीतील स्टुटगार्ट येथे आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत फडकवला होता. या ध्वजावर लाल, हिरवा आणि पिवळा अशा तीन रंगांचे पट्टे होते. त्यात सूर्य आणि चंद्राचीही चित्रे होती. या ध्वजाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला आंतरराष्ट्रीय मंचावर सादर केले. भिकाजी कामा यांचे हे पाऊल भारतीय स्वातंत्र्याच्या संघर्षाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे होते. (Photo Source: Social Media)

  • 4/7

    तिसरा ध्वज (१९१७)
    तिसरा ध्वज डॉ. ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी १९१७ मध्ये होमरूल आंदोलनादरम्यान फडकवला होता. त्यावर लाल आणि हिरव्या रंगाचे पट्टे होते आणि वर युनियन जॅक होता. ध्वजावर सात तारे आणि एक चंद्र आणि तारा देखील होता. मात्र, ब्रिटिश साम्राज्याचे प्रतीक असलेल्या युनियन जॅकमुळे हा ध्वज वादग्रस्त ठरला आणि अनेकांनी याला विरोध केला. (Photo Source: Social Media)

  • 5/7

    चौथा ध्वज (१९२१)
    हा ध्वज पांढरा, हिरवा आणि लाल रंगाचा होता, मध्यभागी एका चरख्याचे चित्र होते. हा ध्वज अधिकृतपणे काँग्रेस पक्षाने स्वीकारला नव्हता, परंतु भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने त्याचा वापर केला होता. हा ध्वज भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक बनला आणि त्याची रचना पिंगली व्यंकय्या यांनी प्रस्तावित केली होती. महात्मा गांधींना हा ध्वज आवडला आणि त्यात चरखा वापरण्यात आला.(Photo Source: Social Media)

  • 6/7

    पाचवा ध्वज (१९३१)
    भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने १९३१ मध्ये अधिकृतपणे हा ध्वज स्वीकारला. या ध्वजात लाल रंग काढून वरच्या बाजूला भगवा (केशरी), हिरवा रंग तळाशी आणि पांढरा रंग मध्यभागी ठेवण्यात आला होता. चरखा पांढऱ्या रंगामध्ये ठेवला होता. हा ध्वज महात्मा गांधींनी मंजूर केला होता आणि भारतीय राष्ट्रीय सैन्याने (INA) देखील वापरला होता. या ध्वजाकडे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्वाचे प्रतीक म्हणून पाहिले जात होते. (Photo Source: Social Media)

  • 7/7

    वर्तमान ध्वज (१९४७)
    अखेर २२ जुलै १९४७ रोजी भारतीय संविधान सभेने सध्याच्या राष्ट्रध्वजाला मान्यता दिली. या ध्वजात चरख्याच्या जागी अशोक चक्र ठेवण्यात आले, जे भारतीय स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक आहे. हे चक्र सम्राट अशोकाच्या काळातील आहे आणि त्याला ‘धम्मचक्र’ असेही म्हणतात, जे अहिंसेचे तत्व प्रदर्शित करते. या ध्वजाची रचना पिंगली व्यंकय्या यांनी केली होती. भगवा रंग हिंदू धर्माचे प्रतीक, हिरवा रंग मुस्लिम समाजाचे तर पांढरा रंग शांतता आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेल्या भारतीय ध्वजाच्या रंगांचे महत्त्वही यातून स्पष्ट करण्यात आले. (Photo Source: Social Media)
    हेही वाचा- Padma Awards 2025 : अशोक सराफ ते अरुंधती भट्टाचार्य, महाराष्ट्रातील ‘या’ दिग्गजांना पद्म पुरस्कार जाहीर

TOPICS
प्रजासत्ताक दिन २०२५Republic Day 2025मराठी बातम्याMarathi Newsराष्ट्रध्वजNational Flag

Web Title: Republic day 2025 evolution of our indian flag from 1906 to 1947 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.