पुणे : सामाजिक उन्नयन आणि स्वातंत्र्याच्या लढ्याचा हा दिवस आहे. देशात हजारो वर्षे सामाजिक आणि राजकीय गुलामी होती. या दोन्ही गोष्टी कोरेगाव भीमाच्या लढाईत संपल्या. भारतीय स्वातंत्र्याच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासाला या लढाईपासून सुरुवात झाली. त्यामुळे आज राजकीय काहीही बोलणार नाही, अशी टिप्पणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> भीमा-कोरेगावला न जाण्यामागचं कारण चंद्रकांत पाटलांनी केलं स्पष्ट; म्हणाले…“शाईचं काय, छातीवर गोळ्याही…”

कोरेगाव भीमा ऐतिहासिक स्तंभाला आंबेडकर यांनी सपत्नीक अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आंबेडकर म्हणाले, की सामाजिक उन्नयन आणि स्वातंत्र्याच्या लढ्याचा हा दिवस आहे. देशात हजारो वर्षे सामाजिक आणि राजकीय गुलामी होती. या दोन्ही गोष्टी कोरेगाव भीमाच्या लढाईत संपल्या. त्याचे प्रतिक असलेल्या या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनेक लोक येतात.

हेही वाचा >>> कोरेगाव-भीमा परिसरात कडेकोट बंदोबस्त; ७० जणांना उपस्थित राहण्यास मनाई

राज्यातील सत्ताधाऱ्यांनी या अभिवादन कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्याबाबत प्रश्न विचारल्यावर आंबेडकर म्हणाले, की अभिवादन करण्यासाठी कोणी यायचे, कोणी यायचे नाही, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे यावर भाष्य करणार नाही. आज कोणतेही राजकीय भाष्य करणार नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today is not a day for political talk prakash ambedkar statement on the day of bheema koregaon pune print news psg 17 ysh