पवना धरणातून पिंपरी-चिंचवडला थेट पाणी देण्याऱ्या बंद नळयोजनेच्या विरोधातील आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारास दोन वर्ष पूर्ण झाली. तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर तापलेल्या वातावरणात मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाचे काम बंद ठेवण्याचे आदेश दिले, ते काम अजूनही बंदच आहे. तथापि, उपमुख्यमंत्र्यांना ते सुरू करायचे असल्याने पिंपरी पालिकेचा आटापिटा सुरू आहे. मयतांच्या वारसांना पिंपरी पालिकेत नोकरी देण्याचे अजितदादांनी विधानसभेत दिलेले आश्वासन हवेतच विरले असून गोळीबाराचे आदेश देणाऱ्या तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांच्याविषयीचा चौकशी अहवाल तसाच पडून आहे.
पवना धरणापासून रावेतपर्यंतच्या ३५ किलोमीटर अंतराची योजना असून तिचा मूळ खर्च ३३९ कोटी होता. मात्र, २० टक्के जादा दराची निविदा मंजूर केल्याने सुरूवातीलाच ४०० कोटीवर खर्च गेला. ३० एप्रिल २००८ ला कामाचे आदेश निघाले. ७२ गावांनी योजनेला विरोध करून ग्रामसभांचे ठराव दिले.
संग्रहित लेख, दिनांक 7th Aug 2013 रोजी प्रकाशित
पवना नळयोजनेचे काम बंदच; मृत शेतकऱ्यांचे वारस नोकरीविना
पवना धरणातून पिंपरी-चिंचवडला थेट पाणी देण्याऱ्या बंद नळयोजनेच्या विरोधातील आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारास दोन वर्ष पूर्ण झाली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 07-08-2013 at 02:44 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply to pimpri chinchwad from pavana dam after 2 years maval firing