अमित वाडेकर
देशात १९७५ मध्ये आणीबाणी लादण्यात आली. पण सत्तेत असूनही या निर्णयाला विरोध करणारा एक नेता होता. तत्त्वासाठी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देणाऱ्या या नेत्याची आज- १४ फेब्रुवारी रोजी जन्मशताब्दी आहे.
पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या आयुष्याचा पट म्हणजे देशप्रेमाने भारावलेल्या एका असामान्य व्यक्तीचा संघर्षमय, राजकीय व सामाजिक प्रवास होता. वयाच्या सोळाव्या वर्षी ते देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले. तिरंगी झेंडे फडकवत स्वतंत्र भारतासाठी घोषणाबाजी करत मिरवणूक काढल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली आणि सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. महाड येथील पोलीस कोठडी, त्यानंतर ठाणे व नंतर विसापूरच्या तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले होते. किशोरवयातील या कारावासादरम्यान त्यांच्यावर समाजवादी विचारांचा प्रभाव पडला. त्यामुळे त्यांनी डॉक्टर होण्याचा निर्णय बदलला आणि न्यायाकरिता झगडण्यासाठी वकिलीचे शिक्षण घेण्याचे ठरवले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी आपल्या नेतृत्व कौशल्याच्या बळावर शेकडो तरुणांना, विद्यार्थ्यांना संघटित केले आणि कामगार चळवळीशी स्वतःला जोडून घेतले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
