मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका, मुंब्रा बाह्यवळण मार्ग, शिळफाटा भागात पडलेल्या खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीसमोर ठाणे पोलिसांनीही आता गुडघे टेकल्याचे बोलले जाते. नागरिकांनी अनावश्यक कारणांसाठी बाहेर पडू नका किंवा रेल्वेगाड्यांतूनच प्रवास करा अशा सूचना त्यांनी वाहन चालकांना दिल्या आहेत.
ड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती आहे. ठाणे पोलिसांच्या ट्विटर खात्यावरून त्यांनी ही सूचना प्रसारित केली आहे.
जिल्ह्यात मुख्य मार्ग आणि महामार्गांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. खारेगाव टोलनाका भागातही मोठे खड्डे पडल्याने शिळफाटा, गॅमन रोड, दहिसर मोरी, वाय जंक्शन, मुंब्रा बाह्यवळण भागात त्याचा परिणाम वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे ठाणे पोलिसांनी ट्विटर खात्यावर वाहन चालकांना सूचना केल्या आहेत.
अत्यावश्यक कारणांसाठी कोणीही घराबाहेर पडू नये, मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांनी महापे एरोली मार्गे प्रवास करावा, खड्ड्यांमुळे अपघात घडू शकतो. त्यामुळे रेल्वेगाड्यांनी प्रवास करावा असे या ट्वीट मध्ये म्हटले आहे. या खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पोलीसही हतबल झाल्याचे बोलले जात आहे.
