कल्याण मधील चिकणघर भागातील एका महिलेचा तिच्या कुटुंबीयांनी मानसिक, शारीरिक छळ केला. तिला घरात सतत अपमानास्पद वागणूक देऊन तिला माहेरी जाण्यास भाग पाडले. कुटुंबीयांच्या या छळाला कंटाळून रविवारी रात्री महिलेने राहत्या चाळीतील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.या प्रकरणात या महिलेचा पती केवल बंडू भोईर, सासरा बंडु विष्णू भोईर, सासु इंदिराबाई यांच्या विरुध्द महिलेचा भाऊ अविनाश वारघडे (रा. वडवली, ता. भिवंडी) यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>डोंबिवलीत औषध दुकानांमधील वाढत्या चोऱ्यांमुळे विक्रेत्यांमध्ये नाराजी,औषध विक्रेता संघटनेकडून पोलीस अधिकाऱ्यांची भेट

वडवली गावातील वारघडे कुटुंबातील एका तरुणीचे काही वर्षापूर्वी कल्याण मधील चिकणघर येथील केवल भोईर याच्या बरोबर लग्न झाले होते. लग्नानंतर काही महिन्यांनी पती केवल, सासरा बंडू, सासु इंदिराबाई हे सुनेचा सारखा छळ करत होते. तिच्या घरकामाचा भार टाकून त्रास दिला जात होता. तिला माहेरी मोबाईलवर संपर्क करण्यास मज्जाव करण्यात आला होता. सतत शिवीगाळ केली जात होती. या सततच्या त्रासाला कंटाळुन केवलच्या पत्नीने रविवारी रात्री रागाच्या भरात घरातील छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.या सगळ्या प्रकाराला कुटुंबीय जबाबदार असल्याची तक्रार मयत महिलेच्या भावाने महात्मा फुले पोलीस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी पती केवल, सासरा बंडू यांना अटक केली आहे. लवकरच सासु इंदिरबाईला अटक केली जाणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman commits suicide by hanging herself in chikanghar in kalyan amy