जिल्ह्य़ातील टंचाईचा मुकाबला करण्यास यंत्रणेने सज्ज राहावे. टंचाई कामात कसूर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशा इशारा जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता सिंघल यांनी दिला.
हिंगोली पंचायत समितीच्या पाणीटंचाई, घरकूल योजना व करवसुली आदी कामांविषयी बुधवारी आढावा घेण्यात आला. गटविकास अधिकारी डॉ. विलास राठोड, ग्रामस्वच्छता प्रमुख साहेबराव कांबळे व विविध विभागांचे गटप्रमुख उपस्थित होते. बैठकीत इंदिरा आवास, रमाई, बबूल क्षेत्रीय घरकुल योजनेच्या कामांविषयी सिंघल यांनी नाराजी व्यक्त केली. घरकुलाच्या कामासंबंधी त्यांनी सूचना केल्या, भारत अभियान, करवसुली, बांधकाम, महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावा या वेळी घेण्यात आला
संग्रहित लेख, दिनांक 14th Feb 2013 रोजी प्रकाशित
‘टंचाई कामात कसूर करणाऱ्यांची गय नाही’
जिल्ह्य़ातील टंचाईचा मुकाबला करण्यास यंत्रणेने सज्ज राहावे. टंचाई कामात कसूर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशा इशारा जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता सिंघल यांनी दिला.
First published on: 14-02-2013 at 12:40 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action will taken on who is responsible for shortage