‘राज्यातील दुष्काळ अतिशय भीषण असून या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी तीन हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या दुष्काळाची झळ सोळा जिल्ह्य़ांतील बारा हजार गावांना पोहोचली आहे. त्यामुळे केंद्राकडून मिळालेला ७७८ कोटी रुपयांचा निधी पुरेसा नाही.’ अशी माहिती सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे.
पाटील यांनी शुक्रवारी दुष्काळप्रश्नी राज्यातील सहकारी बँका, सोसायटय़ा आणि सहकारी साखर कारखान्यांची मदत घेण्याबाबत संबंधितांशी चर्चा केली. या संस्थांनी दुष्काळी गावे दत्तक घेण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच या भागांतील बालकांच्या तसेच इतर प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पाटील यांनी केले आहे. दुष्काळी जिल्ह्य़ांच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा अकस्मात निधी देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 12-01-2013 at 03:54 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three thousand caror need to fight against draught harshvardhan patil