भिवंडी शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा होऊ लागला असून या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन साथीच्या आजार पसरण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. याच पाश्र्वभूमीवर पिण्याचे पाणी उकळून आणि गाळून घेण्याचा सल्ला महापालिकेने शहरवासियांना दिला आहे. तसेच घरातील पाण्याच्या साठवण टाक्या दिवसाआड स्वच्छ धुवून पाण्याचा दैनंदिन कामकाजाकरिता वापर करण्याच्याही सूचनाही केल्या आहेत.
मुंबई महापालिकेच्या तानसा जलवाहिन्यांमधून भिवंडी-निजामपूर महापालिकेस क्लोरिनयुक्त पाण्याचा पुरवठा होतो. या पाण्याचे महापालिकेच्या जलवाहिन्यांमधून शहरातील वेगवेगळ्या भागात वितरण करण्यात येते. गेल्या काही दिवसांपासून शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा होऊ लागल्याने साथीचे आजार उद्भवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, यंदा पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव आणि धरण क्षेत्रात जास्त पाऊस झाल्यामुळे जलवाहिन्यांमधून गढूळ पाणी येत असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. तसेच या पाण्यामुळे साथीचे आजार उद्भवून नागरिकांच्या आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पावसाळ्यात पिण्याचे पाणी उकळून व गाळून घेण्याचे आवाहन भिवंडी महापालिकेने शहरवासियांना केले आहे. त्याचप्रमाणे पाण्याच्या साठवण टाक्या दिवसाआड स्वच्छ धुवून घेऊन पाण्याचा दैनदिन कामकरिता वापर करावा, असा सल्लाही दिला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Aug 2014 रोजी प्रकाशित
भिवंडी शहरात गढूळ पाणीपुरवठा
भिवंडी शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा होऊ लागला असून या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन साथीच्या आजार पसरण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
First published on: 15-08-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Turbid water supply in bhiwandi