विमान खरेदीच्या बाबतीत भारताची बरोबरी करू शकेल, असा जगात कोणताही देश नाही. भारतीय विमान कंपन्यांनी यावर्षी १ हजार जेटची ऑर्डर दिली आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील दुसरे सर्वात व्यस्त विमानतळ बनण्यासाठी विस्तारत आहे, तर भारताने २०३० पर्यंत आपल्या विमानतळांची संख्या ७४ वरून २३० पेक्षा दुप्पट करण्याची योजना आखली आहे. दरभंगा सारख्या शहरांमध्ये आता दिल्ली, बंगळुरू आणि पलीकडे न थांबता पोहोचणे शक्य झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढील वर्षी १०.९० कोटी प्रवाशांना वाहून नेण्यासाठी सज्ज आहे. हे जगातील दुसरे सर्वात व्यस्त विमानतळ बनणार आहे. या बाबतीत अमेरिकेचे हार्ट्सफील्ड जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ पहिल्या स्थानावर आहे. आजही लोक ट्रेनने प्रवास करणे पसंत करत असतानाच भारतात एवढी विमानतळं आहेत. २० वेळा रेल्वे प्रवास केलेल्यांपैकी व्यक्तीचा एकदाच हवाई प्रवास होतो.

हेही वाचाः UAE भारताला ४ लाख कोटी देण्याच्या तयारीत, चीन पाहतच राहणार अन् पाकिस्तानही थक्क होणार!

आजही बहुतांश भारतीय विमान प्रवास करण्यास घाबरतात. कारण देशातील केवळ ३ टक्के लोक नियमितपणे विमानाने प्रवास करतात. सुमारे १.४० अब्ज लोकसंख्या असलेल्या देशात ही संख्या केवळ ४.२ कोटी आहे. विमानाने प्रवास करणाऱ्या या ४.२ कोटी लोकांपैकी बहुतांश अधिकारी, विद्यार्थी आणि अभियंते आहेत, ज्यांना व्यवसाय किंवा सुट्टीसाठी देशात कमी वेळेत लांबचे अंतर कापावे लागते. अमेरिकेची बोईंग आणि युरोपची एअरबस या जगातील दोन सर्वात मोठ्या विमान उत्पादक कंपन्यांचा भारताच्या विमान वाहतूक बाजाराच्या विस्तारात मोठा वाटा आहे. टाटाच्या एअर इंडियाने फेब्रुवारीमध्ये एअरबसकडून २५० विमाने आणि बोईंगकडून २२० विमाने खरेदी करण्यासाठी ७० अब्ज डॉलरची ऑर्डर दिली होती. जूनमध्ये इंडिगोने एअरबसला ५०० विमानांची ऑर्डर दिली.

हेही वाचाः ”माझी शिफ्ट संपली; आता मी निघतोय…”, मूर्तींच्या ७० तास काम करण्याच्या पद्धतीवर Gen Z चा प्रतिसाद पाहा

भारतीय विमान वाहतुकीच्या वाढीचा मोठा भाग देशांतर्गत विमान कंपन्यांचा आहे, ज्यांनी २०२२ पासून आतापर्यंत प्रवासी संख्येत ३६ टक्के वाढ नोंदवली आहे. कोरोना काळानंतर परदेशी पर्यटकांचे आगमन पुन्हा वाढत आहे, परंतु ते पूर्वीपेक्षा कमी आहे. विमान कंपन्या आता नवनवे गंतव्यस्थान जोडत आहेत. अझरबैजान, केनिया आणि व्हिएतनाम येथे भारताची आर्थिक राजधानी दिल्ली किंवा मुंबईतून थेट विमान उड्डाणे आहेत. येथे एकेरी भाडे २१ हजार रुपये (२५० डॉलर) पेक्षा कमी आहे. दिल्ली आणि मुंबई दरम्यानचा एअर कॉरिडॉर आधीच जगातील १० सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक होता. दिल्लीप्रमाणेच मुंबईतही नवीन विमानतळ टर्मिनल्स आहेत.

११ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक

मोदींच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात विमानतळांची संख्या ७४ वरून १४८ वर पोहोचली आहे. विमान वाहतूक मंत्री, ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, २०३० पर्यंत किमान २३० विमानतळं असतील. सरकारने गेल्या दशकात विमानतळांवर ११ अब्ज डॉलरहून अधिक गुंतवणूक केली आहे आणि सिंधियाने आणखी १५ अब्ज डॉलर देण्याचे वचन दिले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No country in the world can match india in air plane respect vrd