राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली तीन मंत्र्यांची समिती स्थापण्यात आली आहे. दिल्लीमध्ये राष्ट्रपतीपदासाठी होणाऱ्या निवडणुकीमुळे वातावरण तापले आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अरूण जेटली आणि व्यंकय्या नायडू यांच्या या समितीमध्ये समावेश आहे. ही समिती एनडीएच्या घटक पक्षांसोबत चर्चा करणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावर सगळ्या पक्षांचे एकमत न झाल्यास १७ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची २८ जून पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
भाजपकडे टीआरएस आणि जगनरेड्डी पक्षाचा पाठिंबा आहे. तसेच एनडीएकडून राष्ट्रपतीपदासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाल्यास भाजप आणि पर्यायाने एनडीचे पारडे जड असणार आहे. मात्र अमित शहा यांना निवडणुकांमध्ये कोणतीही कसर सोडायची नाहीये. म्हणूनच या त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. शिवसेनेची भूमिका काय आहे? त्याचा परिणाम काय होतो याचा अंदाजही भाजपला अद्याप आलेला नाही. त्यामुळे भाजपकडून खबरदारी घेतली जाते आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jun 2017 रोजी प्रकाशित
राष्ट्रपतीपद निवडणूक-अमित शहांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती
एनडीएने जिंकलेल्या निवडणुकांचा कौल पाहता राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाल्यास एनडीएचे पारडे जड आहे
Written by लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 12-06-2017 at 15:51 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 top ministers on amit shahs panel to consult allies on next president