Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

भारतीय जनता पार्टी

भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. देशात २०१४, २०१९ आणि २०२४ साली या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या (२०१४, २०१९) तुलनेत भाजपाला २०२४ साली स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ २९३ जागांवरच समाधान मानावे लागले. यात भाजपाचा वाटा २४० इतका आहे. २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकत स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले होते. परिणामी भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी भाजपाला फटका बसला.


संविधानात बदल घडवण्याची चर्चा, कांद्याला भाव, महागाई, बेरोजगारी, पिकाला हमीभाव आदी प्रश्नांवर विरोधकांनी भाजपाला कोंडीत टाकले होते. या कारणांमुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपाला सहयोगी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.


पक्षाची स्थपाना आणि इतिहास (Formation and History of the BJP)

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.


१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.


Read More
The Shinde group disapproved of MP Narayan Rane statement that BJP should contest 288 seats in the assembly elections
‘भाजपने विधानसभा निवडणुकीत २८८ जागा लढवाव्यात’; खासदार नारायण राणे यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाकडून नापसंती

भाजपने विधानसभा निवडणुकीत २८८ जागा लढवाव्यात, अशी टिप्पणी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजप प्रदेश कार्यालयात शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार…

lokmanas
लोकमानस: भाजप म्हणेल तेच खरे?

‘विश्वासामागील वास्तव’ हे संपादकीय (२६ जुलै) वाचले. एखाद्या गोष्टीची जाहिरात का करावी लागते? आपला माल इतरांच्या तुलनेत दर्जेदार नसेल तरच! घातक…

Prakash Ambedkar marathi news
“भाजपने हरवले; मग आम्ही त्यांची बी टीम कशी?”, प्रकाश आंबेडकर यांची विचारणा

मला भाजपने हरवले असताना असे कसे म्हंटले जाते, अशी विचारणा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केली.

Ramesh Kuthe BJP Joins Shivsena UBT
Ramesh Kuthe : “बावनकुळेंचं ते वाक्य ऐकून वाटलं, आपली फसवणूक झालीय”, माजी आमदारासह अनेक पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश

Ramesh Kuthe Joins Shivsena UBT : माजी आमदार रमेश कुथे यांचा शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश.

supreme court hearing on kanwar yatra
Kanwar Yatra Update: “नाव सांगण्याचा कुणावर दबाव टाकता येणार नाही”, सुप्रीम कोर्टानं यूपी सरकारला सुनावलं!

कावड यात्रेच्या मार्गावरील स्टॉलधारकांना त्यांची नावं जाहीर करण्याचे आदेश उत्तर प्रदेशपाठोपाठ मध्य प्रदेश व उत्तराखंड सरकारनेही दिले होते.

Nishikant Dubey hindu statement
“झारखंड-पश्चिम बंगालमधील काही भाग केंद्रशासित म्हणून घोषित करा, अन्यथा येथील हिंदू…”; भाजपा खासदाराचं विधान!

गुरुवारी लोकसभेत बोलताना त्यांनी हे विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.

Prime Minister Narendra Modi instructions to BJP MPs to break the propaganda of the opposition
विरोधकांचा अपप्रचार मोडून काढा! पंतप्रधान मोदींची भाजप खासदारांना सूचना

संसदेच्या दोन्ही सदनांतील भाजपच्या खासदारांची गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली.

Girish Mahajan On Anil Deshmukh
“तेव्हा झोपले होते का?”, गिरीश महाजनांचा अनिल देशमुखांवर हल्लाबोल

प्रा.श्याम मानव यांनी केलेल्या विधानाला अनिल देशमुखांनी दुजोरा दिला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही इशारा देत अनिल देशमुखांचं रेकॉर्डिंग माझ्या हाती…

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis
“जेवढं गोडी गुलाबीने घ्याल तेवढं तुमच्यासाठी…”, मनोज जरांगेंचा फडणवीसांना पुन्हा इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांना एकदा इशारा दिला. “जेवढं गोडी गुलाबीने घ्याल तेवढं तुमच्यासाठी चांगलं”, असं जरांगे यांनी म्हटलं आहे.

Jitendra Awhad on Raj Thackeray
“राज ठाकरे राजकारणाला चित्रपट समजतात”, जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका

राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकेवरून आता शरद पवार गटाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली.

Kangana Ranaut, Kangana Ranaut news
9 Photos
कंगना रणौत यांची खासदारकी जाणार?, उच्च न्यायालयाने का पाठवली नोटीस, जाणून घ्या

राम नेगी नावाच्या व्यक्तीने कंगना यांचे संसदेतील सदस्यत्व रद्द करून मंडीमध्ये पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे.

kangana ranaut first loksabha speech marathi
Kangana Ranaut First Loksabha Speech: अभिनेत्री कंगना रणौतचं लोकसभेत पहिलं भाषण; कोणते मुद्दे मांडले? पाहा Video!

Kangana Ranaut First Speech News: अभिनेत्री व खासदार कंगना रणौतनं पहिल्या भाषणात ‘हा’ मुद्दा मांडला!

संबंधित बातम्या