scorecardresearch

भारतीय जनता पार्टी

भारतीय जनता पार्टी (BJP) हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्ष आहे. २०१४ सालापासून सलग दोन निवडणुकांमध्ये भाजपाचे बहुमत मिळवत सत्ता राखली. नरेंद्र मोदी भाजपाचे सर्वोच्च नेते असून अमित शाह दुसऱ्या पातळीवरचे नेते मानले जातात. तर जेपी नड्डा हे भाजपाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला (Bharatiya Janata Party) ४८ पैकी २३ जागा मिळाल्या. मात्र, मुख्यमंत्रीपदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत फूट पडली आणि त्यांची युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि इंडियन नॅशनल काँग्रेसबरोबर युती करत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. १९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली.

जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी ह्यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी ह्या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.

१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) ह्यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (Bhajapa) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थॅंवरचंद गेहलोत, शिवराजसिंग चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.
Read More
Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका; म्हणाले, “काँग्रेसने अनेक वर्ष राज्य केलं, पण जनतेला फक्त चॉकलेट…”

सांगली लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचाराची सभा पार पडली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी…

ujjwal nikam bjp marathi news
प्रख्यात फौजदारी कायदेपंडित उज्ज्वल निकम यांना भाजपकडून उमेदवारी ?

निकम यांनी देशविरोधी कारवायांमधील अतिरेक्यांना शिक्षा होण्यासाठी बजावलेल्या भूमिकेचा या मतदारसंघात चांगला राजकीय उपयोग होईल, असे भाजपला वाटत आहे.

Maharashtra Congress leader Naseem Khan
‘एमआयएम’ अन् वंचितची ऑफर आहे का? काँग्रेसच्या स्टार प्रचारकाच्या राजीनाम्यानंतर नसीम खान यांनी स्पष्ट केली भूमिका

काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी पक्षाच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिल्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसला धक्का बसला. यानंतर त्यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारक…

MP Sanjay Raut criticizes to Shinde group
संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, “शिंदे गट आणि अजित पवार गटाचा एकही खासदार…”

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली. ‘शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा एकही खासदार…

Congress announced candidates in Haryana
जातीय समीकरणं साधत काँग्रेसने हरयाणात जाहीर केले उमेदवार; भाजपाला रोखण्यासाठी विशेष डावपेच

कुमारी शैलजा यांना सिरसामधून, दीपेंद्र सिंह हुडा यांना रोहतकमधून, वरुण चौधरी यांना अंबालामधून, जय प्रकाश यांना हिसारमधून, दिव्यांशु बुधीराजा यांना…

hathras gangrape bjp loksabha (1)
हाथरस बलात्कार प्रकरणामुळे भाजपा अडचणीत? काँग्रेस-सपा भाजपाचा बालेकिल्ला भेदणार का?

निवडणूक सुरू असल्याने हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेबाबत कोणताही उमेदवार उघडपणे बोललेला नाही. हाथरस लोकसभा मतदारसंघात दलित आणि ठाकूर यांचे वर्चस्व…

Shivsena MP Sanjay Raut On PM Modi In Kolhapur
पंतप्रधान मोदींच्या कोल्हापूरच्या सभेवरून संजय राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, “शाहू महाराज छत्रपती यांचा…”

कोल्हापुरातील तपोवन मैदानावर शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी…

srirupa mitra chaudhary
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाच्या ‘निर्भयादीदी’ची जादू; कोण आहेत श्रीरूपा मित्रा-चौधरी?

पश्चिम बंगालमधील मालदा दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार श्रीरूपा मित्रा-चौधरी यांनी आपल्या अनोख्या प्रचाराने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Lok Sabha Elections 2024 Narendra Modi
एका दगडात दोन पक्षी, मोदी आणि भाजपा दोघांनी ४०० पार जागांचा अर्थच बदलला

मतदानाच्या पहिल्या टप्प्यापर्यंत जेव्हा ४००चा पार आकड्याचा उल्लेख व्हायचा, तेव्हा जनता समाधानी आहे, त्यांना केंद्रात पुन्हा मोदी सरकार हवे आहे,…

Sanjay Raut slams modi on mangalsutra jibe
“प्रचारात मुसलमानांना खेचावे लागले याचा अर्थ…” मंगळसूत्राच्या विधानावरून शिवसेना उबाठा गटाची मोदींवर टीका

काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदू महिलांची मंगळसूत्रही काढून घेतली जातील आणि अधिक मुलं असणाऱ्यांना वाटली जातील, असं विधान पंतप्रधान मोदींनी केलं…

Despite being in the grand alliance Bachu kadu in Amravati against BJP Navneet Rana
महायुतीत असूनही अमरावतीत बच्चू कडू भाजपच्या नवनीत राणांच्या विरोधात… ते सतत वादग्रस्‍त का ठरतात?

लोकसभा निवडणुकीदरम्‍यान महायुतीत असूनही भाजपच्‍या उमेदवाराविरुद्ध रणशिंग फुंकणारे आमदार बच्‍चू कडू कायम चर्चेत असतात, त्‍यांच्‍याविषयी….

What Sharad Pawar Said About Modi?
शरद पवारांचं सांगोल्यात वक्तव्य, “नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं धोकादायक, कारण…”

शरद पवार यांनी सांगोल्यातल्या प्रचारसभेत एक किस्सा सांगितला आणि त्यानंतर मोदींना पुन्हा निवडणं कसं धोकादायक आहे ते सांगितलं.

संबंधित बातम्या