बांगलादेशवरील विजयासह भारतीय संघाने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. बुमराहने ४८ व्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर बांगलादेशच्या दोन फलंदाजांना एकापाठोपाठ त्रिफळाचीत करत तंबूत धाडत भारताच्या विजयावर शिक्का मोर्तब केला. भारताने बांगलादेशवर २८ धावांनी विजय मिळवला. तर भारताने दिलेल्या ३१५ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव २८६ धावांवर आटोपला. जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ बळी घेतले, तर पांड्याने ३ बळी घेत त्याला उत्तम साथ दिली. चहल, शमी आणि भुवीला प्रत्येकी एक बळी मिळाला.
India qualifies for the semi-final with this win. #CWC19 https://t.co/R53bhhe8lQ
— ANI (@ANI) July 2, 2019
तत्पुर्वी सलामीवीर रोहित शर्माचे शानदान शतक (१०४), लोकश राहुलचे अर्धशतक (७७) आणि ऋषभ पंतच्या (४८) धावांच्या बळावर भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी ३१५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. एकवेळ रोहित शर्मा आणि लोकश राहुल खेळपट्टीवर असताना भारत यापेक्षाही मोठी धावसंख्या उभारेल असे वाटले होते. पण रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मोठी भागीदारी होऊ शकली नाही. भारताच्या मधल्या फळीचे अपयश आज पुन्हा जाणवले. रोहितने मोठया धावसंख्येचा पाया रचला होता. पण अन्य फलंदाजांना त्यावर कळस चढवता आला नाही. मुस्ताफिझूर रहमानच्या बांगलादेशकडून यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने १० षटकात ५९ धावांमध्ये भारताचा निम्मा संघ तंबूत पाठवला.
भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने आजच्या सामन्यात दोन बदल केले होते. कुलदीप यादव आणि केदार जाधवला संघातून वगळण्यात आले व त्यांच्या जागी भुवनेश्वर कुमार आणि दिनेश कार्तिकला संधी दिली होती. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात कुलदीप महागडा गोलंदाज ठरला होता. त्यामुळे त्याच्या जागी भुवनेश्वरला संधी देण्यात आली होती.
Highlights
बांगलादेशचा २८ धावांनी पराभव केल्याने भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित झाला आहे. तर बांगलादेश मात्र स्पर्धेबाहेर गेला आहे.
मोहम्मद सैफुद्दीनने बांगलादेशला गरज असताना महत्वपूर्ण खेळी केली आहे, ३७ चेंडूत ५० धावा केल्या आहेत.
बांगलादेशला २७ चेंडूत ४६ धावांची आवश्यकता असुन २६९ धावांवर ८ गडी बाद झाले आहेत.
बांगलादेशला आठवा धक्का; मश्रफे मोर्तझा बाद, भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर धोनीने त्याचा झेल टिपला
बांग्लादेशला सातवा धक्का बसला आहे, जसप्रीत बुमराह शब्बीर रहमानला त्रिफळाचीत केले
मोहम्मद सैफुद्दीन व शब्बीर रहमानची ४६ चेंडूत ५० धावांची भागीदारी झाली आहे. बांगलादेशसाठी ही महत्वपूर्ण खेळी आहे. २३० धावांवर बांगलादेशचे ६ गडी तंबूत परतले आहेत.
फलंदाजीत जरी अपयशी ठरला असला तरी हार्दिक पांड्याने आज तुफान गोलंदाजीचे प्रर्दशन करत बांगलादेशचे तीन महत्वाचे फलंदाज तंबूत पाठवले आहेत. ८ षटकात ५१ धावा देऊन त्याने तीन गडी टिपले आहेत. यात शाकिबची महत्वाची विकेटही त्यानेच मिळवली.
बांगलादेशच्या विजयासाठी एकाकी झुंज देणारा व भारताच्या विजयातील मोठा अडसर ठरणाऱ्या शाकिब अल हसनला तंबूत पाठवत हार्दिक पांड्याने बांगलादेशला सहावा व मोठा धक्का दिला. शाकिब ६६ धावांवर बाद झाला.
जसप्रीत बुमराहाने मोसादैक होसैन त्रिफळा उडवला आणि बांगलादेशचा अर्धा संघ तंबूत परतल्यात जमा झाला. १७७ धावांवर बांगलादेशचे पाच गडी तंबूत परतले आहेत. ३३ षटक संपली आहेत.
बांगलादेशला विजयासाठी ११४ चेंडूत १४६ धावांची आवश्यकता आहे. ३१ षटक संपली आहेत. १६९ धावांवर चार गडी बाद झाले आहेत.
हार्दिक पांड्याने लिटन दासला विराट कोहलीकडे झेल देण्यास भाग पाडत बांगलादेशला चौथा धक्का दिला. या विकेटमुळे बांगलादेशची एक महत्त्वाची भागीदारी तुटली.
शाकिब अल हसननं संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये चांगली फलंदाजी केली असून आजही भारताविरोधात ५८ चेंडूंमध्ये नाबाद ५० धावा केल्या आहेत. शाकिबची विकेट घेणं भारतासाठी महत्त्वाचं असून तो बाद झाला नाही तर भारताला जिंकणं अवघड होणार आहे.
बांगलादेश प्रचंड धावसंख्येच्या दबावाखाली आला असून मुशफिकूर रेहमानचा अडसर चहलनं दूर केला आहे. बांगलादेशला प्रति षटक सातपेक्षा जास्त धावगतीचं आव्हान असून ते पेलणं त्यांना जड जाताना दिसत आहे. भरात असलेला फलंदाज शाकिब अल हसन ४० धावांवर खेळत आहे. त्याच्या जोडीला लिटन आला आहे.
बांगलादेशला १२१ धावांवर तिसरा धक्का बसला. मुशफिकुर रहीम २४ धावांवर युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला.
सौम्या सरकारच्या रूपाने पंधराव्या षटकात ७४ धावांवर बांगलादेशला दुसरा धक्का बसला. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने त्याचा झेल टिपला.
मोहम्मद शमी तमिम इकबाल बोल्ड करत बांगलादेशला ४० धावांवर पहिला धक्का दिला
भारताने दिलेले ३१५ धावांचे लक्ष्य साधण्यासाठी बांगलादेशच्या फलंदाजीस सुरूवात झाली आहे.
सलामीवीर रोहित शर्माचे शानदान शतक (१०४), लोकश राहुलचे अर्धशतक (७७) आणि ऋषभ पंतच्या (४८) धावांच्या बळावर भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी ३१५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात महेंद्रसिंह धोनी मुस्ताफिझूर रहमानच्या गोलंदाजीवर ३५ धावांवर बाद झाला. त्याने शाकीब हसनकडे सोपा झेल दिला.
हाणामारीच्या षटकात दिनेश कार्तिक आठ धावांवर मुस्ताफिझूर रहमानच्या गोलंदाजीवर बाद झाला आहे. त्याने मोसादीक होसेनकडे झेल दिला.
भारताला पाचवा धक्का बसला आहे. ऋषभ पंत ४८ धावांवर बाद झाला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात शाकीब अल हसनच्या गोलंदाजीवर मोसादीक होसेनकडे झेल दिला. पंतने ४१ चेंडूतील ४८ धावांच्या खेळीत सहा चौकार आणि एक षटकार लगावला.
चांगल्या सुरुवातीनंतर भारताचा डाव अडचणीत आला आहे. कर्णधार कोहली पाठोपाठ अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांडया शून्यावर बाद झाला आहे. मुस्ताफिझूर रहमानच्या गोलंदाजीवर सौम्य सरकारने पांडयाचा झेल घेतला.
भारताला तिसरा धक्का बसला आहे. कर्णधार विराट कोहली (२६) धावांवर बाद झाला आहे. मुस्ताफिझूर रहमानच्या गोलंदाजीवर सीमारेषेवर रुबेल होसेनने कोहलीचा झेल घेतला. २७ चेंडूत २६ धावा काढणाऱ्या कोहलीने तीन चौकार लगावले.
भारताचे सलामीवीर रोहित आणि राहुल तंबूत परतल्यानंतर ३४ व्या षटकात भारताने २०० धावांचा टप्पा पार केला आहे. ऋषभ पंतच्या शानदार षटकाराने भारताने २०० धावांचा टप्पा ओलांडला. आता पंत आणि कर्णधार विराट कोहली खेळपट्टीवर आहे.
रोहित शर्मापाठोपाठ लोकेश राहुलही बाद झाला आहे. राहुलने ७७ धावा केल्या. रुबेल होसेनच्या गोलंदाजीवर राहुलने यष्टीरक्षक मुशाफीकुर रहिमकडे झेल दिला. राहुलने अर्धशतकीय खेळीत सहा चौकार आणि एक षटकार लगावला.
शानदार शतक झळकवल्यानंतर रोहित शर्मा लगेच बाद झाला. त्याने ९२ चेंडूत १०४ धावा केल्या. सौम्य सरकारच्या गोलंदाजीवर लि़टॉन दासकडे रोहितने झेल दिला. शतकी खेळीत रोहितने सात चौकार आणि पाच षटकार लगावले.
भारताचा सलामीवीर रोहित शर्माने बांगलादेश विरुद्ध शानदार शतक झळकवले आहे.
ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला मागे टाकून रोहित शर्मा यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. डेव्हिड वॉर्नरच्या ५१६ धावा झाल्या आहेत. रोहितने या विश्वचषकात तीन शतके झळकवली आहेत.
रोहित शर्मा आणि लोकश राहुल बांगलादेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत आहेत. भारताच्या बिनबाद दीडशे धावा पूर्ण झाल्या आहेत. रोहित शर्मा ८८ धावांवर खेळत असून त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि पाच षटकार लगावले आहेत.
रोहित शर्मा पाठोपाठ सलामीवीर लोकेश राहुलनेही अर्धशतक झळकावले आहे. राहुलने ५८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. यात पाच चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. वनडेमधील हे त्याचे चौथे अर्धशतक आहे. भारताच्या १९ षटकात बिनबाद ११७ धावा झाल्या आहेत.
नऊ धावांवर मिळालेल्या जीवदानाचा रोहित शर्माने पुरेपूर फायदा उचलला असून ४५ चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. रोहितचे वनडेमधील हे ४३ वे अर्धशतक आहे. अर्धशतकीय खेळीत रोहितने चार चौकार आणि तीन षटकार लगावले. भारताच्या १५ षटकात बिनबाद ८८ धावा झाल्या आहेत.
सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने कर्णधार विराट कोहलीचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरवला आहे. दोघांनी १४ षटकात बिनबाद ७८ धावा केल्या आहेत.
भारताचा सलामीवीर रोहित शर्माला नऊ धावांवर तमीम इक्बालने झेल सोडून जीवदान दिले. भारताच्या सात षटकात ३६ धावा झाल्या आहेत. रोहित (२३) तर लोकेश राहुल (११) धावांवर नाबाद आहे.
भारताने आजच्या सामन्यात दोन बदल केले आहेत. कुलदीप यादव आणि केदार जाधवला वगळले असून त्यांच्या जागी भुवनेश्वर कुमार आणि दिनेश कार्तिकला संधी दिली आहे.इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात कुलदीप यादव महागडा गोलंदाज ठरला होता. त्याने १० षटकात ७२ धावा दिल्या होत्या. केदार जाधवला अनेकदा संधी मिळूनही तो अपेक्षित छाप पाडू शकलेला नाही.
भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात जशी खेळपट्टी होती तशीच आताही आहे. फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिळू शकते. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम फलंदाजी स्विकारावी असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीने व्यक्त केले. विश्वचषक स्पर्धेमध्ये गांगुली सध्या समालोचकाची भूमिका बजावत आहे.
एजबॅस्टनच्या मैदानावर भारत विरुद्ध बांगलादेश सामना होत आहे. रविवारी इंग्लंड विरुद्ध याच मैदानावर सामना झाला होता. एकाबाजूने या मैदानाची सीमारेषा छोटी आहे. त्याचा फायदा इंग्लंडच्या सलामीवीरांनी उचलला होता. सलामीवीर जॉनी बेअरस्टोने यझुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या भारताच्या फिरकी गोलंदाजांवर हल्लाबोल करुन धावा वसूल केल्या होत्या. आज पुन्हा एकदा गोलंदाजांसमोर आव्हान असणार आहे.
गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया १४ गुणांसह अव्वल स्थानावर असून भारत ११ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताला उपांत्यफेरीत प्रवेश करण्यासाठी आजच्या सामन्यात बांगलादेशचा पराभव करणे आवश्यक आहे. बांगलादेशनंतर भारताचा शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. बांगलादेशचा संघ सात सामन्यात तीन विजय आणि तीन पराभवांसह सातव्या स्थानावर आहे. स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी त्यांनाही विजय आवश्यक आहे.
बांगलादेशमध्ये 2015 मध्ये खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यांनंतर बांगलादेशला भारताचा पराभव करता आला नाही. परंतु त्यानंतर झालेल्या अनेक सामन्यांमध्ये बांगलादेशने भारताला ‘काँटे की टक्कर’ दिली होती. खेळाडूंच्या हाताबाहेर असलेल्या काही समीकरणांमुळे बांगलादेशला अनेकदा भारतापुढे शरणागती पत्करावी लागली.
WC 2019: भारत विरुद्ध बांगलादेश, काय सांगतो इतिहास?
इंग्लंडकडून ३१ धावांनी पराभव झाल्यानंतर भारतीय संघ आज बांगलादेशविरोधात मैदानात उतरणार आहे. यावेळी भारतीय संघात दोन मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे. भारताने आतापर्यंत सात पैकी पाच सामने जिंकले असून एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. गुणतालिकेत भारतीय संघ सध्या दुसऱ्या स्थानावर आहे.
WC 2019: भारतीय संघात आज दोन मोठे बदल होण्याची शक्यता, ‘या’ खेळाडूंवर असेल नजर