सध्या इंटरनेट बँकिंग आणि यूपीआयचा वापर करणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अगदी किराणामालापासून ते तिकीटांपर्यंत अनेक ठिकाणी लोक ऑनलाइन व्यवहार करताना दिसतात. देशभरामध्ये ऑनलाइन व्यवहार वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रोत्साहनही दिलं जात आहे. मात्र यूपीआय किंवा नेट बँकिंग करताना चुकून एखाद्या अनोखळी व्यक्तीच्या खात्यावर पैसे गेल्यास काय करावं हे तुम्हाला ठाऊक आहे का? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची यासंदर्भात एक सविस्तर नियमावली उपलब्ध असून ती बँकांना बंधनकारक आहे. रिझर्व्ह बँकेने ही नवी नियमावली नुकतीच अपडेट केली आहे. चुकून एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या फोन नंबरवर अथवा खात्यावर पैसे गेल्यास ४८ तासांमध्ये म्हणजेच दोन दिवसांमध्ये हे पैसे रिफंड म्हणून मिळवता येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यूपीआय आणि नेट बँकींगचे व्यवहार झाल्यानंतर स्मार्टफोनवर एक मेसेज येतो. हे मेसेजच तुम्हाला अशापद्धतीने चुकीचे व्यवहार झाले तर पैसे परत मिळवून देण्यास फायद्याचे ठरतात. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार केल्यानंतर हे मेसेज लगेच डिलीट करु नका. या मेसेजमध्ये पीपीबीएल क्रमांक असतो. चुकून वेगळ्याच क्रमांकावर पैसे गेले असतील तर पीपीबीएल क्रमांकाच्या मदतीनेच रिफंड मिळवता येतो.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What to do if you transfer funds to the wrong account via upi or net banking here is how to get it back in refund scsg
First published on: 03-10-2022 at 17:02 IST