Harbhajan Singh On IPL Players: कोलकाताचा रिंकू सिंग आणि राजस्थान रॉयल्सचा यशस्वी जैस्वाल आयपीएल२०२३ मध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसली. रिंकू सिंग या स्पर्धेत फिनिशर म्हणून उदयास आला आहे, तर जैस्वालने एक जबरदस्त सलामीवीर म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. या दोन्ही फलंदाजांची दमदार कामगिरी पाहून भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने त्यांना टीम इंडियात घेण्याची बीसीसीआयला विनंती केली आहे. याशिवाय त्याने अर्जुन तेंडुलकरलाही सल्ला दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना हरभजन सिंग म्हणाला, “माझा विश्वास आहे की जेव्हा कोणी चांगले खेळत असेल किंवा चांगला कामगिरी करत असेल, तेव्हा तो व्यवस्थेचा एक भाग असावा. मी असे म्हणत नाही की त्याला थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले जावे. पण त्याला संघात ठेवा जेणेकरून तो शिकू शकेल आणि भारतासाठी योग्य पर्याय उपलब्ध होईल. मला वाटते की रिंकू आणि यशस्वी यांच्या जवळच्या खेळाडूंच्या गटात असण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यांना दरवर्षी निवडल्या जाणाऱ्या करारातील २० किंवा ३० खेळाडूंपैकी एक असायला हवे. यशस्वी आणि रिंकू सारख्या प्रतिभावंतांसाठी हे माझे गृहितक असू शकते, पण खरे सांगायचे तर तसे नाही. ते आधीच या पातळीवर खेळत आहेत आणि चांगले कामगिरी करत आहेत. त्यांना आता संधी द्या, अन्यथा खूप उशीर होईल.”

हेही वाचा: IPL2023: जेव्हा संघाचे मालक प्रार्थना तेव्हा…; संजीव गोयंका मोहसीन खान-लखनऊसाठी प्रार्थना करताना दिसले, पाहा Video

रिंकू सिंग आणि यशस्वी जैस्वाल यांच्याशिवाय त्याने अर्जुन तेंडुलकरबद्दलही मोठे विधान केले आहे. त्याचे पदार्पण विकेट रहित झाले असेल, पण पुढच्या सामन्यात त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध २० धावांचा बचाव केला. मात्र, एका सामन्यात त्याने एका षटकात ३१ धावा दिल्या. अशा स्थितीत रोहित शर्माने त्याला संघातून वगळले. यावर भज्जी म्हणाला, “त्याला अजूनही आपल्या खेळात सुधारण्याची गरज असून तो खूप प्रतिभावान खेळाडू आहे. अर्थातच प्रत्येकाला वेळ लागतो. ५० सामने खेळणारा खेळाडूही भक्कम खेळाडू असेलच याची खात्री नसते. प्रत्येक सामन्यात तो खूप काही शिकत जातो. अर्जुनलाही यातून काहीतरी शिकायला मिळाले असेल.”

हेही वाचा: IPL2023: “आयपीएलने ही एक…”, सामन्यानंतर क्रुणाल पांड्याने मार्कस स्टॉयनिसचे केले कौतुक, या दोघांचा मजेशीर Video व्हायरल

भज्जी पुढे म्हणाला की, “अर्थात, तो ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो, ते मैदानावर पाहणे चांगलेच आहे. आम्ही सर्वांनी पाहिले की एक महागडे ३१ धावांचे षटक त्याने टाकले. मात्र त्यावर सतत टीका करणे योग्य नाही. अगदी मोठ्या खेळाडूंनाही मार पडला आहे, पण चांगली गोष्ट म्हणजे खेळाडू यातूनच पुढे शिकतात.” भज्जी पुढे म्हणाला, “जर तो खेळला नसता तर त्याला या खेळाचे कटू सत्य समजले नसते. शेवटी, जेव्हा तुम्ही शर्यतीत धावता आणि मागे पडता तेव्हाच तुम्हाला जाणवते की तुम्हाला स्वतःवर अधिक काम करण्याची गरज आहे. त्याला कोणत्या क्षेत्रात काम करायचे आहे आणि कसे परतायचे हे त्याला कळेल. तो एक चांगला खेळाडू म्हणून पुनरागमन करेल.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 harbhajan wants to see rinku and jaiswal in team india immediately said this also big statement on arjun tendulkar avw