वर्धा जिल्ह्य़ातील एका शेतकऱ्याचे पीककर्ज बँकेने वसूल केले. पंतप्रधान योजनेंतर्गत त्याचे कर्ज माफ झाले, तरी बँक अथवा पूर्ती साखर कारखान्याने शेतकऱ्याला ते परत केले नाही. अशा पद्धतीने ही रक्कम हडपून पूर्ती साखर कारखान्याने गैरप्रकार केल्याचा आरोप ‘आप’च्या नेत्या अंजली दमानिया यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. या आरोपासंबंधीचे निवेदन दुपारीच नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी नेऊन दिले होते. दुपारी चार वाजेपर्यंत त्यांनी खुलासा केला नसल्याने राजकारणातून संन्यास घ्यावा, अशीही मागणी त्यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anjali damania brings another purti scam to expose nitin gadkari