सांगली : महाविकास आघाडीचं सरकार पडतेय, त्याचं मला अजिबात दु:ख नाही. कारण महाविकास आघाडीचे सरकार जनताभिमुख राहिले नसल्याने आम्ही दोन महिन्यांपूर्वी या सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला आहे. मात्र हे सरकार पडताना ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे भाजपाचे प्रभावी कार्यकर्ते म्हणून काम करत असल्यासारखे दिसत असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजपावर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गुरुवारी रात्री मिरजेत आले असता शेट्टी माध्यमांशी अनौपचारिक बोलत होते. या वेळी ते म्हणाले,की भाजपा ज्या पद्धतीने पाशवी वृत्ती दाखवून मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आता महाराष्ट्र मधील सरकार पाडतेय हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक आहे. महाविकास आघाडीचं सरकार पडतेय, त्याचं मला अजिबात दु।ख नाही. कारण महाविकास आघाडीचे ेसरकार जनताभिमुख राहिले नसल्याने  आम्ही दोन महिन्यांपूर्वी या सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavikas aghadi government not sad to fall raju shetty ysh
First published on: 25-06-2022 at 00:02 IST