रेणुका शहाणे व आशुतोष राणा यांनी लग्नापूर्वी तीन वर्षे एकमेकांना डेट केलं. या जोडीने २००१ साली एकमेकांसह लग्न केलं. रेणुका व आशुतोष यांना शौर्यमन आणि सत्येंद्र अशी दोन मुलं आहेत. रेणुका यांनी नुकतीच गौहर खानला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी आशुतोष राणांबरोबरच्या रिलेशनशिप व लग्नाबद्दल सांगितलं आहे. यासह त्यांनी आशुतोष राणा यांनी त्यांच्या गुरूंच्या सांगण्यानुसार त्यांच्याशी लग्न केल्याचं म्हटलं आहे.
मुलाखतीमध्ये रेणुका म्हणाल्या, “आशुतोष राणा आणि मी एकमेकांच्या प्रेमात होतो. आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनातही खूप आनंदी होतो. कलाकार असल्याने, तेही आम्ही आमच्या करिअरमध्ये चांगली कामं करत असताना लग्न ही खूप मोठी गोष्ट वाटायची; त्यामुळे लग्नामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये काहीही चुकीचं होऊ नये असं वाटायचं.” पुढे रेणुका शहाणे यांनी आशुतोष राणा यांच्याशी लग्न का केलं यामागचं कारण सांगितलं आहे.
रेणुका म्हणाल्या, “आशुतोष राणा यांनी त्यांच्या गुरूंच्या सांगण्यानुसार माझ्याबरोबर लग्न केलं. आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो तेव्हा गुरु त्यांना म्हणाले की, मी तुझ्यासाठी एका मुलीची निवड केली आहे. त्यावेळी आशुतोष घाबरले होते. ती कोण आहे असं म्हणाले, कारण आशुतोष यांना माहीत नव्हतं की ते माझ्याबद्दलच बोलत आहेत. माझ्याबद्दल बोलताना ते म्हणाले, ती एक चांगली मुलगी आहे, तू तिला लग्नासाठी विचारायला हवं.” पुढे रेणुका म्हणाल्या, ही गोष्ट आशुतोष यांनी रेणुका यांच्या आईला सांगितली. आईच्या प्रतिक्रियेबद्दल सांगताना रेणुका म्हणाल्या, “जेव्हा आशुतोष यांनी याबाबत माझ्या आईला सांगितलं तेव्हा ती म्हणाली, तू तिच्याबोरबर फक्त गुरूंच्या सांगण्यानुसार लग्न करत आहेस की तुला खरंच लग्न करायचं होतं.”
रेणुका शहाणेंनी आशुतोष राणा यांच्याबरोबर त्यांनी लग्न केल्यामागचं कारण सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, “मी आशुतोष यांच्यासह लग्न केलं कारण मला मुलं हवी होती. माझ्या मुलांनी एका चांगल्या कुटुंबात लहानाचं मोठं व्हावं अशी माझी इच्छा होती आणि आशुतोष यांना कुटुंबाचं महत्त्व माहीत होतं, त्यामुळे मला ते योग्य व्यक्ती वाटले. आपल्याला आपल्या मुलांसाठी जसे वडील अपेक्षित असतात तसेच ते होते”.