मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडींपैकी एक म्हणजे सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर. मराठीतील हे क्यूट कपल नेहमी चर्चेत असतं. २४ जानेवारी २०२१ साली दोघांनी लग्नगाठ बांधली होती. मोठ्या थाटामाटात सिद्धार्थ व मितालीचा लग्नसोहळा पार पडला होता. पण लग्नाच्या तीन वर्षांनंतर सिद्धार्थमध्ये काय बदल झाले? जाणून घ्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – सिद्धार्थ चांदेकर सावत्र वडिलांना बाबा नव्हे तर ‘या’ नावाने मारतो हाक; म्हणाला, “त्यांना मी हे नातं…”

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर नुकताच ‘लोकमत फिल्मी’च्या ‘नो फिल्टर’ या कार्यक्रमात सहभागी झाला होता. तेव्हा सिद्धार्थला विचारलं की, लग्नानंतर तुझ्यात काय बदल झाले? यावर अभिनेता म्हणाला, “माझ्या कपाटाच्या साइजमध्ये खूप बदल घडलेला आहे. तसंच मी आधी सतत काळजी, चिंता करणारा माणूस होतो. तर आता ते माझं सतत चिंता करण्याचं प्रमाण कमी झालंय. शांतता आली असं वाटतंय. याशिवाय मी माझ्या लग्नानंतर कामाकडे जास्त लक्ष देऊ लागलो. मिताली माझ्या करिअरसाठी अत्यंत लकी ठरली.”

हेही वाचा – शेजारचे मुद्दाम विचारायचे खोचक प्रश्न; सिद्धार्थ चांदेकर ‘तो’ काळ आठवत म्हणाला…

“आता माझ्या करिअरची गाडी धावतेय. नंतर ती हळू होईल, थांबेल किंवा बिघडेल. पण या आयुष्यात सुंदर बायका आहेत ना, यांच्यामुळे मला माहितीये की, परत एकदा मी तो वेग घेणार, ती गाडी परत जोरदार धावणार. मला आता थांबेल किंवा बिघडेल या गोष्टींची भीती नाहीये. महत्त्वाचं म्हणजे लग्नानंतर मला अपयशी होण्याची भीतीच वाटतं नाही. कधी ना कधीतरी अपयश येणारचं आहे. मात्र अपयश येऊ नये यासाठी माझे हात आताच थरथरत नाहीयेत. मला अपयश आलं तर तेव्हा जे काही दुःख होईल, त्रास होईल या सगळ्याला मी सामोर जाऊ शकतो. मी खूप हसत-खेळत असं नाही म्हणणार. पण मी सामोर जाऊन पुन्हा कमबॅक करेन. लग्नानंतर ही माझ्यात शक्ती आली आहे,” असं सिद्धार्थ म्हणाला.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor siddharth chandekar told what changes happened after marriage pps