मुंबई : पाणीपुरवठा विषयक दुरुस्तीमुळे आज, मंगळवारी २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० ते ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.  २४ तास काम चालणार असून या कालावधीत मुंबईतील १२ विभागांमध्ये पाणीपुरवठय़ावर परिणाम होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पवई उच्चस्तर जलाशयाच्या १२०० मिलीमीटर वाहिनीवरील ३०० मिलीमीटर बायपास जल वाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम, तसेच वेरावली जलाशय १ व २ साठी १८०० मिलीमीटर व्यासाची नवीन आगम वाहिनीचे जोडकाम मंगळवार, २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेपासून बुधवार, ३० नोव्हेंबर सकाळी ८.३० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.

या कालावधीत वांद्रे ते गोरेगाव, भांडुप, कुर्ला, विद्याविहार या विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. तसेच अंधेरी, विलेपार्ले पश्चिम विभागातील परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित राहील. अंधेरी पूर्व, दादर , माहीम, गोरेगाव  विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. वांद्रे, खार पश्चिम  विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा कमी कालावधीसाठी होईल आणि काही परिसरात कमी दाबाने होणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc announces water cut in half of mumbai zws