Gateway Of India Boat Accident : मुंबईतल्या एलिफंटा परिसरात बुधवारी सायंकाळी प्रवासी बोट बुडाली असून आतापर्यंत या बोटीवरील २१ जणांना वाचविण्यात यश आले. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू ( Gateway Of India Boat Accident ) झाला. दरम्यान, या बोटीवर ३० ते ३५ प्रवासी होते. त्यांना वाचवण्यासाठी नौदल व मुंबई पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात आलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नीलकमल नावाची बोट बुडाली

एलिफंटा येथे जाणारी ‘नीलकमल’ नावाची फेरीबोट बुडाल्याची ( Gateway Of India Boat Accident ) प्राथमिक माहिती आहे. त्यामध्ये ३० ते ३५ प्रवासी असल्याचे समजते. नौदल, जेएनपीटी आणि तटरक्षक दल तसंच यलोगेट पोलीस ठाण्यातील आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचावकार्य करण्यात आलं. आपण जाणून घेऊया नीलकमल बोटीचा हा अपघात नेमका कसा घडला?

प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने नेमकं काय सांगितलं?

अपघातानंतर ( Gateway Of India Boat Accident ) प्रवाशांना किनाऱ्यावर आणण्यात आलं. त्यापैकी एका प्रवाशाने सांगितलं, आमची बोट पाच ते सात किमी समुद्रात होती. त्यावेळी मी बोटीच्या डेकवर उभा होतो. एक स्पीड बोट आमच्या आजूबाजूला फिरत होती. ही स्पीड बोट आम्हाला धडकू शकते अशी भीती मला वाटली. नेमकं घडलंही तसंच. ही स्पीडबोट भरधाव वेगाने आली आणि आमच्या बोटीला जोरात धडकली. त्यावेळी स्पीडबोटमधल्या एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर दुसऱ्याचा पाय कापला गेला. रक्तबंबाळ अवस्थेतल्या त्या जखमी प्रवाशाला आमच्या बोटीत घेण्यात आलं. स्पीडबोटची धडक जोरात बसल्याने आमच्या बोटीत पाणी शिरु लागलं आणि बोट बुडू लागली अशी माहिती या प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने दिली आहे. एबीपी माझा या वाहिनीशी बोलताना ही माहिती त्याने दिली.

नीलकमल बोट जवळपास सुमारे सात किमी समुद्रात गेल्यानंतर समोरून आलेल्या एका स्पीड बोटने आमच्या बोटीला धडक ( Gateway Of India Boat Accident ) दिली. ‘नीलकमल’ या बोटीत पाणी भरु लागलं. त्यानंतर सर्व प्रवाशांना लाईफ जॅकेट्स घालण्यास सांगितलं गेलं. पण तोपर्यंत बोट पाण्यात बुडाली होती. मी जवळपास १५ मिनिटं पाण्यामध्ये पोहत होतो. धडक दिलेल्या स्पीड बोटीमध्ये ८ ते १० लोक होते. असंही या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “इंडियन नेव्हीच्या स्पीड बोटीचा ताबा सुटल्याने हा अपघात ( Gateway Of India Boat Accident ) झाला आहे. यामध्ये १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ज्यांना वाचवलं आहे त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येतील. तर मृतांच्या कुटुंबीयांसाठी राज्य सरकारकडून मदत दिली जाईल.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gateway of india boat accident how the accident happened scj