उस्मानाबाद, औरंगाबादच्या नामांतरामागे ऐतिहासिक कारण!, राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा

नामांतरामुळे सामाजिक तणाव, धार्मिक किंवा जातीय द्वेष, तेढ निर्माण होणार नाही, असा दावा राज्य सरकारने सोमवारी उच्च न्यायालयात केला.

name change of Osmanabad, Aurangabad
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मुंबई : उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्यामागे राजकीय नव्हे, तर ऐतिहासिक कारणे आहेत. त्यामुळे नामांतरामुळे सामाजिक तणाव, धार्मिक किंवा जातीय द्वेष, तेढ निर्माण होणार नाही, असा दावा राज्य सरकारने सोमवारी उच्च न्यायालयात केला. याउलट स्कंद पुराण आणि भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या गॅझेटमध्येही (१९०९च्या इम्पिरियल गॅझेटियर ऑफ इंडिया) उस्मानाबादचे नाव धाराशिव असल्याचेही नमूद होते, असा दावाही सरकारने केला. तसेच आपल्या निर्णयाचे समर्थन केले. उस्मानाबादच्या नामकरणामुळे बहुसंख्य नागरिकांनी आनंद साजरा केल्याचा दावाही राज्य सरकारने प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 00:44 IST
Next Story
जी-२० व्यापार, गुंतवणूक कार्यगटाची आजपासून मुंबईत बैठक, रस्त्यावर रोषणाई
Exit mobile version