कोरडा गेलेला जून आणि तलावक्षेत्रातील आटत चाललेले पाणी यामुळे मुंबईकरांवरील पाण्याचे संकट अधिकच गहिरे झाले आहे. या पाश्र्वभूमीवर २० टक्के पाणीकपातीचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. परंतु पाणीकपातीचा निर्णय झाला असला तरी निर्णयाची अधिकृत घोषणा बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.
जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात अवघ्या काही सरी पडल्यानंतर संपूर्ण महिना कोरडा गेला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या विक्रमी पावसाने भरलेल्या तलावांमधील पाण्याची पातळीही झरझर आटली. मुंबईला पाणीपुरवठा होत असलेल्या वैतरणा तलावक्षेत्रात अवघ्या १५ दिवसांचा तर भातसा तलावक्षेत्रात जेमतेम महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईला दररोज सरासरी ३७५० दशलक्ष लिटर पाणी लागते. उपलब्ध असलेला १,१८,८१५ दशलक्ष लिटर पाणीसाठा मुंबईकरांची तहान ३१
कोयनेतील वीजनिर्मिती बंद
नाशिक : पाणीटंचाई पाठोपाठ राज्यावर वीजटंचाईचे संकट ओढवले असून पाणी, गॅस व कोळशाअभावी वीजनिर्मितीवर विपरित परिणाम झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी नाशिक येथे दिली. पाण्याअभावी कोयना तर गॅसअभावी दाभोळ प्रकल्पात वीजनिर्मितीचे काम बंद झाले आहे. नाशिकच्या एकलहरा केंद्रात १४ दिवस पुरेल, इतकाच कोळसा शिल्लक आहे. त्यामुळे पाणी व विजेचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. नाशिक विभागातील टंचाईचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार येथे आले होते.
तलावातील पाण्याची
पातळी खालावली आहे. शहरातील पाणी कपातीबाबतचा प्रशासनाचा निर्णय बुधवारी स्थायी समितीच्या संमतीनंतर लागू करण्यात येईल. पाणीकपात केव्हा आणि किती लागू करायची याबाबत समितीतच शिक्कामोर्तब होईल.
– सीताराम कुंटे, महापालिका आयुक्त.