दोन-तीन दिवस मंत्रालयात बसा, असे मंत्र्यांनाच सांगावे लागते, याचा अर्थ राज्यातील मंत्री काम करीत नाहीत, असा होतो. त्यामुळे मंत्र्यांसाठी बायोमेट्रिक जीपीएस सिस्टिम सुरू करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत केली. त्यांनी राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारवर टीका केली.
मंत्र्यांना सांगावे लागते की २ ते ३ दिवस तरी मंत्रालयात बसा. याचा अर्थ मंत्री काम करत नाही.@nawabmalikncp
— NCP (@NCPspeaks) January 14, 2016
कोणतेही निर्णय छगन भुजबळ यांनी व्यक्तिगतरीत्या घेतलेले नाहीत. हिच पक्षाची भूमिका आहे. @nawabmalikncp
— NCP (@NCPspeaks) January 14, 2016
सरकार विरोधी पक्षात असताना राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी खोटे आरोप करत होते. आता आरोप खरे करण्यासाठी चौकशी होत आहे. @nawabmalikncp
— NCP (@NCPspeaks) January 14, 2016
सरकारच्या नव्या जीआरनुसार शेतकऱ्यांना जाहीर झाल्यापैकी अर्धीच मदत मिळणार आहे. हा जीआर मागे घ्या अशी आमची मागणी आहे.@nawabmalikncp
— NCP (@NCPspeaks) January 14, 2016