नागपूर : आयुर्वेद, युनानी आणि तत्सम औषध किंवा इतर उत्पादनाच्या माध्यमातून विविध आजार बरे केले जात असल्याचा दावा करणाऱ्या जाहिराती प्रकाशित केल्या जातात. त्यातून अनेकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढत आहे. गडचिरोलीचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लेखी प्रश्नाच्या माध्यमातून सरकारचे या मुद्याकडे लक्ष वेधले होते. यासंदर्भात आयुष मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन वर्षात २४ हजार १७४ तक्रारी प्राप्त झाल्या. यात २०२२मध्ये ७,३६७, २०२३मध्ये ७,७७१ आणि २०२४ मध्ये (नोव्हेंबरपर्यंत) ९,०३२ तक्रारी प्राप्त झाल्या. या आकडेवारीवर नजर टाकल्यास दरवर्षी तक्रारींच्या ंसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रभावी उपाययोजनांची गरज

भ्रामक जाहिरातींद्वारे ग्राहकांची दिशाभूल रोखण्यासाठी आयुष मंत्रालयाने अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या नियंत्रणाखाली देशभरात ९९ पेरिफेरल फार्माकोव्हिजिलन्स केंद्रे स्थापन केली आहेत. त्याद्वारे दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर लक्ष ठेवून सरकारला कळवले जाते. आतापर्यंत ३७८ प्रकरणात नोटीस बजावण्यात आली आहे, असे आयुष मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

कंपन्यांकडून खोटे दावे

बऱ्याच कंपन्या त्यांचे उत्पादन आयुर्वेदापासून तयार केल्याचा दावा करतात. तशा जाहिरातीही करतात. विशेषत:काही औषधे व सौंदर्यप्रसाधनांचा त्यात समावेश असतो. अनेकदा यातून सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक होते. त्यावर प्रतिबंध हवा. डॉ. नामदेव किरसान, खासदार, गडचिरोली.

तक्रारींची वाढती संख्या

वर्षतक्रारी
२०२२ ७,३६७,
२०२३ ७,७७१
२०२४ ९,०३२
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Advertisements claiming to cure ailments through ayurveda and unani medicines are increasing fraud rates cwb 76 sud 02