Solar Explosives Company Explosion Nagpur : नागपूर : बुधवारीमध्यरात्रीनंतर नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोसिव कंपनीत भीषण स्फोट झाला. यात एका कामगाराचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान प्रहार संघटनेचे प्रमुख व माजी मंत्री बच्चू कडू यांनी सोलार कंपनी परिसराला भेट दिली असून कंपनीच्या प्रवश्व्दारापुढे निदर्शने सुरू केली आहे. स्फोट प्र्करणात कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करावा,अशी मागणी कामगार, त्यांचे नातेवाईक यांच्यावतीने कडू यांनी केली आहे.
बुधवारी मध्यरात्री झालेल्या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत गेल्याने परिसराील शेकडो गावकरीआणि कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचे नातेवाईक बाजारगावमधील कंपनीच्या प्रवेशव्दारापुढे जमा झाले होते. त्यांना कंपनीत प्रवेश नाकारल्याने व आतमध्ये काय झाले याची माहिती देत नसल्याने ते संतप्त झाले होते. दरम्यान गुरुवारी या घटनेची माहिती कळताच प्रहार संघटनेचे प्रमुख व माजी मंत्री बच्चू कडू घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने प्रहारचे कार्यकर्ते होते. त्यांनी कंपनीच्या प्रवेशव्दारापुढे जोरदार निदर्शने केली. या प्रकरणी कंपनीच्या मालकावर गुन्हे दाखल करा ,अशी मागणी केली. दरम्यान व्यवस्थापनाने कडू यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाला भेटीसाठी बोलवले. कडू हे त्यांच्या शिष्टमंडळासह चर्चेसाठी गेले. पण थोड्या वेळाने ते परत आले.
काय म्हणाले कडू
दोन दिवसात जर स्फोट प्र्करणात कंपनीच्या मालकावर गुन्हे दाखल झाले नाही तर, पोलीस ठाणे आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घातला जाईल,असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. कंपनीत वारंवार अपघात घडत असून कामगाराचे प्राण जात आहेत, मत्र तरीही पोलीस ,प्रदुषण महामंडळ आणि जिल्हा प्रशासन काहीच करीत नाही, याबाबत कडू यांनी संताप व्यक्त केला. रात्री साडेबारा वाजताआहच्या सुमारास प्लांटमधून धूर उठताना दिसला. त्वरित सुरक्षा पथकाने सायरन वाजवून इशारा दिला आणि कामगारांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. बहुतेक कामगार सुरक्षित बाहेर पडले.
बाहेर पडतानाच मयूर गणवीर मृत्युमुखी दरम्यान, RND लॅबमध्ये कार्यरत मयूर गणवीर बाहेर येत असतानाच प्रचंड स्फोट झाला. स्फोटातून उडालेल्या मोठ्या दगडांच्या तडाख्यात ते जागीच ठार झाले.दहा किलोमीटरपर्यंत दुमदुमला आवाज स्फोटाचा आवाज तब्बल दहा किलोमीटरवर ऐकू आला. स्फोट इतका भीषण होता की संपूर्ण इमारत कोसळली व मलबा थेट राष्ट्रीय महामार्गावर पडला. कंपनी परिसरातील HR ऑफिस, सिक्युरिटी ऑफिस तसेच मुख्य इमारतीचे मोठे नुकसान झाले. कंपनीत उभ्या असलेल्या बसची काच फुटली.
दोन कामगारांचे पाय गमवावे लागले मलब्याचा मोठा भाग कंपनीच्या कबाड विभागावर कोसळला. या दुर्घटनेत कैलाश वर्मा व मनीष वर्मा गंभीर जखमी झाले. लोखंडी पत्रा पडल्याने त्यांचे दोन्ही पायाला गंभीर दुखापती झाल्या आणि शेवटी त्यांना पाय गमवावे लागले. पळापळ, गावकऱ्यांची गर्दी स्फोटानंतर कंपनी परिसरात प्रचंड गोंधळ उडाला. आसपासच्या गावांतील नागरिक मोठ्या संख्येने कंपनीच्या प्रवेशद्वारावर जमले व आपल्या नातेवाईकांचा शोध घेऊ लागले.
प्रशासन व पोलिसांची धाव घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपविभागीय अधिकारी पियूष चिवंडे, तहसीलदार राजू रणवीर, एसडीपीओ बापूसाहेब रोहोम तसेच स्फोटक, पर्यावरण, कामगार आणि सेफ्टी विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमींना नागपूर येथील शासकीय रुग्णालय व कंपनीने ठरवलेल्या खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले. काहींचा प्राथमिक उपचार कोंढाळी आरोग्य केंद्रात करण्यात आला. उपद्रवी घटनेनंतर सक्रिय दरम्यान, शेजारच्या गावांतील काही उपद्रवींनी कंपनी परिसरात घुसून तोडफोड केली.
कामगारांच्या बसांची काच फोडली. HR आणि सिक्युरिटी ऑफिसमध्ये घुसून संगणकासह साहित्याची मोडतोड केली. शोकमग्न परिवार व भीतीचे वातावरण या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मृत कामगार मयूर गणवीर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कंपनी परिसरात व आजूबाजूच्या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.