नागपूर : आज देशातील २४४ जिल्ह्यात स्वसंरक्षण सराव (मॉक ड्रिल) करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे यांचा नागरी संरक्षण जिल्ह्यात समावेश आहे. महाराष्ट्र मध्ये १६ ठिकाणी मॉक ड्रिल होत आहे. नागरी संरक्षण तयारीसाठी एक दिवसाचा मॉक ड्रिल हा संपूर्ण भारतात चर्चेचा विषय बनला आहे, पण फार कमी लोकांना माहिती आहे की हे सर्व १९४१ मध्ये एका नागपूरकर व्यक्तीने सुरू केले होते.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

नागपूर येथील बॅरिस्टर ई. राघवेंद्र राव यांनी १९४१ मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान नागरी संरक्षणाची संकल्पना मांडली. हवाई हल्ले आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी नागरिकांना तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले. १८८९ मध्ये जन्मलेले राव हे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. ते १९३६ रोजी मध्य प्रांतांचे (सीपी) राज्यपाल म्हणून नियुक्त झाले. त्यानंतर ई. राघवेंद्र राव यांना १९३७ मध्ये, नवीन संविधानानुसार, सीपी आणि बेरारचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले.

राव यांचे आजोबा सध्याच्या आंध्र प्रदेशातील होते, परंतु कुटुंब नागपूरमध्ये स्थायिक झाले होते. १८८९ मध्ये एका श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या राव यांनी त्यांचे शिक्षण नागपूर, नंतर अलाहाबाद (आता प्रयागराज) आणि शेवटी लंडन येथे पूर्ण केले.

दुसरे महायुद्ध सुरू असताना, २२ जुलै रोजी इंग्लडच्या संसदेत झालेल्या चर्चेत भारताच्या वसाहतीला युद्धाशी जोडण्याची सरकारची योजना काय होती यावर एक प्रश्न विचारण्यात आला. लॉर्ड एच स्नेल यांनी उत्तर दिले की भारतात ते ‘नागरी संरक्षण तयारी’ नावाचा एक नवीन उपक्रम राबवतील आणि नागपूरचा रहिवासी. ई. राघवेंद्र राव यांना त्याचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले.

नागरी संरक्षण खात्याचे पहिले प्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर, राव यांच्यासमोर लोकांना आगळ्या वेगळ्या संकल्पना सादर करण्याचे आव्हान होते. १९४१ मध्ये ऑल इंडिया रेडिओ (एआयआर) वर याबद्दल बोलताना राव म्हणाले, “नागरी संरक्षण म्हणजे काय? ज्यासाठी आपण तयारी केली पाहिजे? त्यात हवाई हल्ल्यांच्या धोक्याला तोंड देण्यासाठी, त्यांच्यामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी त्या सर्व तयारींचा समावेश आहे. या गोष्टी सशस्त्र दलांच्या चिंतेचा विषय नाहीत. लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या सक्रिय संरक्षणापासून वेगळे आहे.

त्यांच्या आयुष्यातील शेवटचे वर्ष राव यांनी नागरी संरक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी समर्पित केले. २९ सप्टेंबर १९४२ रोजी प्रकाशित झालेल्या ब्रिटीश सरकारी दस्तऐवजात नमूद केल्याप्रमाणे, राज्य परिषदेत या योगदानाची दखल घेण्यात आली. परिषदेला कळविण्यात आले की राव “नागरी संरक्षण खात्याचे प्रभारी होते आणि त्यांच्या कमकुवत आरोग्याच्या असूनही, राज्य परिषदेच्या सर्व बैठकांना उपस्थित राहिले आणि सर्वांच्या समाधानासाठी त्यांचे काम केले. त्यांच्या अकाली निधनाने त्यांची उज्ज्वल कारकीर्द संपली आहे.

इंग्लंडमध्ये प्रशिक्षित बॅरिस्टर राव यांचे एका वर्षानंतर १९४२ मध्ये निधन झाले. तोपर्यंत भारतात नागरी संरक्षणाचा एक मजबूत पाया रचला गेला होता, ज्याची आजची मॉक ड्रिल साक्ष देते. राव यांनी सुमारे ८० हून अधिक वर्षयापूर्वी नागरी संरक्षणाचे केलेले नियमांची अंमलबजावणी आज आपल्या देशात होत आहे.

भारतातील एकमेव नागरी संरक्षण महाविद्यालय नागपूरमध्ये आहे. नागपूर येथील बॅरिस्टर ई. राघवेंद्र राव यांच्या नेतृत्वाखाली १९४१ मध्ये नागरी संरक्षण महाविद्यालय सुरू झाले. केंद्रीय गृह खत्याच्या अखत्यारीतील सिव्हिल लाईन्स येथील या महाविद्यालयातचे नाव बदलण्यात आले आहे. आता ते एनडीआरएफ म्हणून ओळखले जाते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur e raghavendra rao indias only one civil defense college in nagpur rbt 74 vsd