नवी मुंबई : दांडीया खेळण्यास मज्जाव केल्याचा राग मनात ठेवत त्याच रात्री त्या युवकाने हातोड्याने डोक्यावर, अंगावर घाव घातले. यात तीन जण जखमी असून त्यातील एकाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केले आहे. यातील आरोपीचे नाव जितेंद्र बाबूलाल पटवा  असे आहे. तर आकाश जैस्वाल असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. रशीद मुबारक आणि अभिषेक भालेराव असे जखमींचे नाव आहेत. हि घटना रबाळे एमआयडीसी भागातील साईनगर परिसरात घडली आहे. फिर्यादी आरोपी व जखमी हे सर्व याच परिसरात राहणारे आहेत, व एकमेकांना ओळखणारे आहेत. २६ तारखेला गरबा खेळत असताना आरोपी हा वेडेवाकडे नाचत होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पनवेल : तरुणीचा विनयभंग करुन डीलेव्हरीबॉयचे पलायन

दुर्गादेवी समोर असला नाच न करण्याचे अनेकदा त्याला सांगण्यात आले तरीही दांडिया न खेळता वेडवाकडे नृत्य करत असल्याने त्याला मंडपातून बाहेर काढण्यात आले. हाच राग मनात ठेवत आरोपीने दांडिया संपल्या नंतर मंडपात झोपलेल्या फिर्यादी व इतरांना हातोडीने मारहाण केली. यावेळी त्याने शिवीगाळ करीत दांडीया का खेळू देत नाही म्हणून आरडाओरडा केला. या प्रकाराने गोंधळ उडाला होता. हे कळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी तातडीने पोलीस पथक पाठवले, आसपासच्या लोकांनी पोलिसांच्या मदतीने जखमींना जिजामाता रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान आकाश याचा मृत्यू मंगळवारी झाला. दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले होते. हि माहिती मिळताच स्वतः पोलीस उपायुक्त विवेक पानसरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस निरीक्षक रमेश जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुंभार व पथकाने भेट दिली.   मंगळवारी संध्याकाळी त्याला अटक करण्यात आली आहे.  अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder for not allowing to play garba in rabale midc area zws