जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नल से जल पुरवठा करण्य़ात येणार असून याकरीत जलस्त्रोतांना दुषित आणि प्रदुषणापासून संरक्षण देण्यासाठी स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरणांची गरज ओळखुन शासन स्तरावरुन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या निवड सुचितील मुख्य संसाधन संस्थामार्फत जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जलस्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील पाच प्रतिनीधींचे दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण व पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती प्रशिक्षणाचा शुभारंभ पंचायत समिती पालघर अंतर्गत चिंतामणी मंगल कार्यालय सभागृह येथे करण्यात आला. तर डहाणु तालुक्यामध्ये लक्ष्मी प्लाझा हॉल येथे शुभारंभ करण्यात आला. या प्रशिक्षणाला ग्राम पाणी पुरवठा समिती अध्यक्ष- सरपंच व सचिव- ग्रामसेवक व इतर तिन सदस्य उपस्थित होते.

पाणी टंचाई दूर करण्यासाठी आणि शाश्वत पाणी व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्यासाठी एक परिवर्तनकारी निर्णय असून, या माध्यमातून ग्रामीण समुदायांमध्ये सामाजिक आर्थिक स्तर उंचावणेसाठी चालना देण्यात येईल. जल जीवन मिशन हा केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सन २०१९ पासून राबविला जात आहे. प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला वैयक्तिक कार्यात्मक घरगुती नळ कनेक्शनाद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.