-
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. सध्या विवेक सिनेसृष्टीपासून दूर असला तरी त्याचा बॉलिवूडमधील संपूर्ण प्रवास फार खडतर होता.
-
मात्र काही वर्षांपूर्वी त्याने चित्रपटसृष्टीत काम करणे बंद केले. विशेष म्हणजे त्याच्या या निर्णयचा त्याला कोणताही पश्चात्ताप होत नाही, असे तो अनेकदा सांगतो.
-
नुकतंच विवेक ‘इनसाइड एज’ या वेबसीरिजमध्ये झळकला होता. यानतंर त्याने दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बॉलिवूडमधील काही कलाकारांविरुद्ध ताशेरे ओढले आहेत.
-
विवेक ओबेरॉयने नुकतंच ‘हिंदुस्तान टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या बॉलिवूडमधील प्रवासाबद्दल सांगितले.
-
बॉलिवूडमध्ये येताना त्याला किती चढ-उतारांचा सामना करावा लागला, याबाबतही त्याने मनमोकळेपणाने भाष्य केले.
-
“मला बॉलिवूडबाबत कोणतीही तक्रार नाही. मात्र सिनेसृष्टीला एखाद्या शाळेप्रमाणे अजिबात विकसित केले जात नाही.” असे त्याने सांगितले.
-
या ठिकाणी टॅलेंटला फार कमी वाव दिला जातो. या ठिकाणी स्वत:ला टिकवून ठेवणे फार कठीण असते.” असेही विवेक म्हणाला.
-
“बॉलिवूड हा एक खास क्लब आहे, जिथे एकतर तुमचे आडनाव असायला हवे किंवा तुम्ही त्या संबंधित लॉबीचा भाग असायला हवा,” असे विवेकने सांगितले.
-
“बॉलिवूडमध्ये फक्त याच गोष्टींची किंमत असते. या ठिकाणी तुमचे टॅलेंट काहीही महत्त्वाचे नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे,” असेही तो म्हणाला.
-
यापुढे विवेक म्हणाला की, “नवीन कलागुणांना पुढे आणण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मी सर्व प्रयत्न करत आहे.”
-
तसेच ‘इनसाइड एज’ या वेब सीरिजबद्दल बोलताना तो म्हणाला की, “ऋचा खूप चांगली कलाकार आहे. तिच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे.”
-
विवेकने २००२ मध्ये राम गोपाल वर्मा यांच्या ‘कंपनी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही.
-
त्यानंतर विवेकने ‘काल’, ‘मस्ती’, ‘प्रिन्स’ ‘साथिया’, ‘शूटआऊट अॅट लोखंडवाला’, ‘ओमकारा’, अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
आज विवेक चित्रपटांपासून लांब असला तरी त्याच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे.
“टॅलेंट नाही तर आडनाव महत्त्वाचे”, विवेक ओबेरॉयने ओढले बॉलिवूडवर ताशेरे
विवेकने २००२ मध्ये राम गोपाल वर्मा यांच्या ‘कंपनी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
Web Title: Surname and the lobby matters more than talent in bollywood said actor vivek oberoi nrp