-
उन्हाळ्यासह आंब्यांच्या सीझन सुरु झाला आहे. यामुळे वर्षभर आंब्याची वाट पाहणाऱ्यांसाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे उपलब्ध झाले आहेत.
-
उन्हाळ्यात चवदार, स्वादिष्ट आंबे खाण्याची एक वेगळीच मज्जा असते. यामुळे लहानांपासून मोठेही अगदी आवडीने आंबे खातात.
-
पण नेहमी आंबा पाण्यात भिजवूनचं मगच खा असे का सांगितले जाते? आणि तसे न केल्यास काय नुकसान होऊ शकते जाणून घेऊ…
-
आंबा पाण्यात भिजवून ठेवल्यास त्यावरील केमिकलचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे तुम्हीही आंबा न भिजवता खात असाल तर ही सवय आजचं बदला.
-
आंबा पाण्यात न भिजवता खाल्ल्यास चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या वाढते.
-
आंबा हा स्वभावाने उष्ण असतो, यामुळे शरीरातही उष्णता वाढते आणि पचनसंस्था आणि आतड्यांवर परिणाम होतो. पण तो भिजवून खाल्ल्यास पोटाचा त्रास कमी होतो
-
आंबा न भिजवता खाल्ल्यास वजन वाढू शकते. कारण त्यात फायटोकेमिकल असते जे वजन वाढवण्याचे काम करते.
-
आंब्याच्या देठावरून एक पांढरा चिकट पदार्थ बाहेर पडतो, ज्यात फायटिक एॅसिड असते. ज्यामुळे आंब्याची चव बदलते. त्यामुळे तो काही भिजवून मगच खाल्ला पाहिजे.
-
आंबा खाण्यापूर्वी भिजवण्यामागे केवळ रसायने, घाण आणि धूळ काढणे एवढाच उद्देश नसतो. तो धुवून न घेतल्यास त्याची गुणवत्ता आणि चवही खराब लागते. (photo credit – pixabay, freepik)
आंबा पाण्यात न भिजवता खाल्ल्यास होऊ शकते ‘हे’ नुकसान
आंब्याचा सीझन सुरु असून वेगवेगळ्या प्रजातीचे आंबे आता उपलब्ध झाले आहेत. मात्र हे आंबे खाण्यापूर्वी नेहमी ते धुवून घेण्याचा सल्ला दिला जातो. पण हा सल्ला देण्यामागचे काय कारण आहे जाणून घेऊ…
Web Title: Mango summer season why mangoes should be soaked in water before eating sjr