-
वर्षापेक्षा अधिक काळ चाललेल्या दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनाने आपल्या मागण्या मान्य करून घेत घराकडे परतायला सुरुवात केलीय.
-
घरी परतत असताना हे शेतकरी आंदोलनस्थळावरील आपल्या अनेक आठवणी सोबत घेऊन जात आहेत. यात एका झोपडीचाही समावेश आहे.
-
ही झोपडी जेसीबीच्या सहाय्याने ट्रकमध्ये भरून पंजाबला नेण्यात आली.
-
याशिवाय सिंघू सीमेवर आंबेडकर ग्रंथालय सुरू करणाऱ्या गुरदीप आणि इतर अनेक आंदोलकांनी या काळात तयार केलेल्या झोपड्यांचे लाकूड आणि इतर साहित्य आजूबाजूच्या गरीब मजुरांनाही देऊ केले आहे.
-
यातून शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने शेतकरी-कामगार एकता दाखवल्याचं किसान एकता मोर्चाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटलं आहे.
-
शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळ सोडताना या परिसराची साफसफाई करण्याची मोहीमही हाती घेतली. यासाठी १०० हून अधिक स्वयंसेवक आणि २० जेसीबी काम करत आहेत.
-
शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळ सोडल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सिंघू सीमेवर लावलेले बॅरिकेट्स आणि सिमेंटच्या भिंती हटवण्यास सुरुवात केलीय. यावर आंदोलक शेतकऱ्यांनी निशाणा साधत पोलिसांनीच रस्ते बंद केल्याचं म्हटलं.
-
किसान मजदूर एकता रुग्णालयाचे संस्थापक असलेल्या लाईफ केअर फाऊंडेशनने सिंघू सीमेवर आंदोलनाच्या काळात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना अभिवादन करण्यासाठी मेणबत्ती प्रज्वलित केल्या.
-
या आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग होता. हे आंदोलन संपल्यानंतर इतर आंदोलकांसह या महिला देखील घराकडे परतत आहेत.
-
आंदोलक घराकडे परतत असताना त्यांच्यावर विमानातून फुलांचा वर्षाव करण्यात आला.
-
यासाठी विशेष विमानाचा वापर करण्यात आला.
-
लहान मुलांनी देखील ठिकठिकाणी हातात झेंडे घेत आंदोलकांचं घरी स्वागत केलं आहे.
Photos : आंदोलनस्थळावरील ‘ती’ झोपडी JCB ने उचलत ट्रकमधून थेट पंजाबला, १०० हून अधिक कार्यकर्ते स्वच्छता मोहिमेवर
वर्षापेक्षा अधिक काळ चाललेल्या दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनाने आपल्या मागण्या मान्य करून घेत घराकडे परतायला सुरुवात केलीय.
Web Title: Photos of farmers vacating protest side at delhi border after repealing farm laws pbs